शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

टास्कफोर्सची स्थापना

By admin | Updated: January 1, 2015 00:25 IST

जालना : जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविणे, होणारे बालविवाह थांबविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर टास्कफोर्सची स्थापना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिले आहेत.

जालना : जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविणे, होणारे बालविवाह थांबविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर टास्कफोर्सची स्थापना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. २२ जानेवारी २०१५ रोजी बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे होणार आहे. या योजनेमध्ये जालना जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्यातील ० ते ६ वयोगटातील मुलींचे लिंग गुणोत्तर, मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणातील गळतीचे प्रमाण घटवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, बालविवाह थांबविणे, मुलींना आरोग्य व स्वच्छता या बाबींची माहिती समजावून देणे आदी बाबी या योजनेअंतर्गत करावयाच्या असून अधिकाऱ्यांनी ही योजना १०० टक्के यशस्वी करण्यासाठी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नायक यांनी केले.ग्रामीण पातळीपर्यंत या योजनेच्या जनजागृतीसाठी होर्डिंग, प्लेक्स तसेच जिल्हा व तालुकास्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामाचा आढावाही जिल्हाधिकारी नायक यांनी घेतला. या बैठकीस जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा शल्य चिकित्सक पाटील, शिक्षणाधिकारी अशोक राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पवार, सर्व शिक्षा अभियानच्या जिल्हा समन्वयक नूतन मघाडे, विरेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)या राष्ट्रीय कार्यक्रमात ज्या सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना सहभाग नोंदवावयाचा असेल त्यांनी महिला व बालकल्याणच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पवार किंवा सर्वशिक्षा अभियानच्या जिल्हा समन्वयक नूतन मघाडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नायक यांनी केले.