शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

फळबाग लागवडीसाठी रोजगार हमीतून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 01:17 IST

पारंपरिक शेती करण्यापेक्षा आता शेतकऱ्यांनी नव्याने फळबाग लागवडीकडे वळण्याची गरज आहे. यासाठी रोजगार हमी अर्थात मनरेगातून याठी आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पारंपरिक शेती करण्यापेक्षा आता शेतकऱ्यांनी नव्याने फळबाग लागवडीकडे वळण्याची गरज आहे. यासाठी रोजगार हमी अर्थात मनरेगातून याठी आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.ते शनिवारी कडवंची येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी पंचक्रोशीतील शेक-यांची उपस्थिती होती.खोतकर यांनी शुक्रवार आणि शनिवारी असे दोन दिवस जालना मतदार संघातील विविध गावांना भेटी देऊन, कर्जमाफी, पीकविमा तसेच बोंडअळीचे अनुदान याचा आढावा घेतला. कडवंची येथे द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने येथे द्राक्षाचा दर्जा तपासण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्या बाबत आपण विचार करत असल्याचे ते म्हणाले. गेल्या काही वर्षात जालना जिल्हयात तुतीची लागवड वाढली असून, त्याच्या खरेदीसाठी जालन्यातच रेशीकोष खरेदीबाजाराची स्थापना केली असून, त्याचा मोठा लाभ शेतकºयांना होत आहे. पूर्वी हे रेषीम कोष विक्रीसाठी शेतक-यांना कर्नाटक राज्यातील रामनगर येथे जावे लागत होते. तेथे जाण्या-येण्याचा खर्च वाचण्यासह वेळेचीही बचत यामुळे होत असल्याचे खोतकर म्हणाले.यावेळी त्यांनी वीज वितरण कंपनीतील अधिका-यांची बैठकही घेतली. वीजपुरवठा खंडित न करण्याच्या सूचना दिल्या.या ग्रामीण दौ-यात त्यांच्या समवेत जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले, कडवंचीचे सरपंच चंद्रकांत पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रArjun Khotkarअर्जुन खोतकर