शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वैयक्तिक गाठीभेटींवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:49 IST

जालना - औरंगाबाद स्थानिक मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीने आता रंगत वाढवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना - औरंगाबाद स्थानिक मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीने आता रंगत वाढवली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीकडून अंबडचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेचे निष्ठावान ज्येष्ठ नेते बाबूराव कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे. तर युतीकडून औरंगाबाद येथील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवेंना रिंगणात उतरवले आहे. या दोन्ही नेत्यांनी आपापल्या पातळीवर प्रचारास प्रारंभ केला असून, वैय्यक्तीक भेटींवर भर देत असल्याचे दिसून येत आहे.जालना - औरंगाबाद विधानपरिषदेत सध्या काँग्रेसचे विद्यमान आ. सुभाष झांबड हे आहेत. त्यमुळे काँग्रेसला यंदाही यश मिळेल काय या दिशेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा कस लागणार आहे. गेल्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी मागे घ्यावी लागल्याने कुलकर्णी नाराज होते. यंदा त्यांची नाराजी काँग्रेसने दूर केली आहे. कुलकर्णी यांना मोठा राजकीय वारसा असून, त्यांचे वडिल अंबडचे आमदार होते. तसेच अंबड पािलकेत काँग्रेसच्या माध्यमातून बहुतांश काळ हा कुलकर्णी परिवाराचा वरचष्मा होता. आजही बाबूराव कुलकर्णी यांचा मुलगा अंबड पालिकेत उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.दरम्यान अंबादास दानवे हे कुलकर्णी यांच्यापेक्षा वयाने तरूण आहेत. तसेच या निवडणूकीत मतदारांचा विचार करता, युतीचे पारडे जड आहे. दानवे हे पूर्वी भाजपमध्ये होते. त्यांनी भाजपयुमोच्या माध्यमातून जालन्यातही तेवढाच संपर्क ठेवला होता. त्यातच युतीकडून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे दिग्गज प्रचारात असल्याने काँग्रेस आणि युतीत चुरस निर्माण झाली आहे. कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी जालन्यात येऊन काँग्रेस नेत्यांच्या तसेच नगरसेवकांच्या भेटी घेतल्या. तसेच दानवे यांनीही एकदा जालन्याचा दौरा केला होता.त्यावेळी त्यांच्या समवेत माजी . खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, शहराध्यक्ष विष्णू पाचफुले आदींची उपस्थिी होती.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकPoliticsराजकारण