शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

बोंडअळीचा धसका; डिसेंबरपर्यंत उत्पादन देणाऱ्या कपाशीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:50 IST

गेल्यावर्षी बोंड अळीच्या हल्ल्याने कपाशीचे उत्पादन घटले होते. तशी स्थिती यंदा होऊ नये म्हणून केवळ डिसेंबर पर्यंतच कपाशीचे उत्पादन देणा-या बियाणांचीच लागवड करावी, अशा सचूना कृषी विभागाने शेतक-यांना दिल्या आहेत.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्यावर्षी बोंड अळीच्या हल्ल्याने कपाशीचे उत्पादन घटले होते. तशी स्थिती यंदा होऊ नये म्हणून केवळ डिसेंबर पर्यंतच कपाशीचे उत्पादन देणा-या बियाणांचीच लागवड करावी, अशा सचूना कृषी विभागाने शेतक-यांना दिल्या आहेत. त्यामुळे बोंड अळीचा हल्ला रोखण्यासाठीचे हे उपाय असल्याचे सांगण्यात आले.यंदा मान्सूनचे आगमन अंदमान-निकोबारच्या समुद्रात झाल्याने तो यंदा वेळेवर बरसेल, अशी आशा आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग, बियाणे व्यापारी व शेतकºयांनी जय्यत तयारी केली आहे. यंदा कपाशीचे क्षेत्र घटणार अशी चिन्हे असली तरी, कृषी विभागाने आठ लाख बिटीची पाकीटे मागवली असून, जवळपास पावणेतीन लाख पाकीट विक्रीसाठी संबंधित दुकानांवर वितरीत केली आहेत. बियाणांप्रमाणे खतांचा साठाही मूबलक प्रमाणात असल्याची माहिती जि.प.चे कृषी विस्तार अधिकारी हरिचंद्र झनझन यांनी दिली आहे.यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस वेळेवर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतक-यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत पूर्ण केली आहे. आता मृग नक्षत्र लागल्यावर एक, दोन चांगले पाऊस झाल्यानंतर शेतकरी खरिपाच्या पेरणीला सज्ज होणार आहे.यंदा जून अखरेपर्यंत खरीपाची किमान ५० टक्के पेरणी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात पाच लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यात कपाशीचे दोन लाख ७५० हेक्टर एवढे क्षेत्र आहे.कपाशी पाठोपाठ सोयाबीन लागवडीला जिल्ह्यात प्राधान्य दिले जाते. सायोबीनचे क्षेत्र हे एक लाख ३३ हजार हेक्टर असून, त्यासाठी २५ लाख ३५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यात महाबीजकडून ८ हजार क्विंटल बियाणे देणे आहे. अन्य पिकांच्या क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यत आहे.बियाणांसह खतांचा मुबलक साठाजिल्ह्यात यंदा कपाशी, सोयाबीनसह अन्य वाणांची बियाणे उपलब्ध करून देण्यात आली असून, बियाणांसह खतांचाही मुबलकसाठा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यंदा एक लाख ८३ हजार मेट्रीक टन खताची मागणी केली होती. पैकी एक लाख ६६ मेट्रीक टन खत जालन्यात दाखल झाले आहे. आतापर्यंत ५८ हजार मेट्रीक टन खत बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे.

 

टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्र