शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीचा धसका; डिसेंबरपर्यंत उत्पादन देणाऱ्या कपाशीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:50 IST

गेल्यावर्षी बोंड अळीच्या हल्ल्याने कपाशीचे उत्पादन घटले होते. तशी स्थिती यंदा होऊ नये म्हणून केवळ डिसेंबर पर्यंतच कपाशीचे उत्पादन देणा-या बियाणांचीच लागवड करावी, अशा सचूना कृषी विभागाने शेतक-यांना दिल्या आहेत.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्यावर्षी बोंड अळीच्या हल्ल्याने कपाशीचे उत्पादन घटले होते. तशी स्थिती यंदा होऊ नये म्हणून केवळ डिसेंबर पर्यंतच कपाशीचे उत्पादन देणा-या बियाणांचीच लागवड करावी, अशा सचूना कृषी विभागाने शेतक-यांना दिल्या आहेत. त्यामुळे बोंड अळीचा हल्ला रोखण्यासाठीचे हे उपाय असल्याचे सांगण्यात आले.यंदा मान्सूनचे आगमन अंदमान-निकोबारच्या समुद्रात झाल्याने तो यंदा वेळेवर बरसेल, अशी आशा आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग, बियाणे व्यापारी व शेतकºयांनी जय्यत तयारी केली आहे. यंदा कपाशीचे क्षेत्र घटणार अशी चिन्हे असली तरी, कृषी विभागाने आठ लाख बिटीची पाकीटे मागवली असून, जवळपास पावणेतीन लाख पाकीट विक्रीसाठी संबंधित दुकानांवर वितरीत केली आहेत. बियाणांप्रमाणे खतांचा साठाही मूबलक प्रमाणात असल्याची माहिती जि.प.चे कृषी विस्तार अधिकारी हरिचंद्र झनझन यांनी दिली आहे.यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस वेळेवर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतक-यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत पूर्ण केली आहे. आता मृग नक्षत्र लागल्यावर एक, दोन चांगले पाऊस झाल्यानंतर शेतकरी खरिपाच्या पेरणीला सज्ज होणार आहे.यंदा जून अखरेपर्यंत खरीपाची किमान ५० टक्के पेरणी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात पाच लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यात कपाशीचे दोन लाख ७५० हेक्टर एवढे क्षेत्र आहे.कपाशी पाठोपाठ सोयाबीन लागवडीला जिल्ह्यात प्राधान्य दिले जाते. सायोबीनचे क्षेत्र हे एक लाख ३३ हजार हेक्टर असून, त्यासाठी २५ लाख ३५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यात महाबीजकडून ८ हजार क्विंटल बियाणे देणे आहे. अन्य पिकांच्या क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यत आहे.बियाणांसह खतांचा मुबलक साठाजिल्ह्यात यंदा कपाशी, सोयाबीनसह अन्य वाणांची बियाणे उपलब्ध करून देण्यात आली असून, बियाणांसह खतांचाही मुबलकसाठा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यंदा एक लाख ८३ हजार मेट्रीक टन खताची मागणी केली होती. पैकी एक लाख ६६ मेट्रीक टन खत जालन्यात दाखल झाले आहे. आतापर्यंत ५८ हजार मेट्रीक टन खत बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे.

 

टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्र