शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST

जालना : सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनामार्फत अनेक योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतात. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ ...

जालना : सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनामार्फत अनेक योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतात. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी योजनांची प्रभावीपणे व गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा दिशा समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

यावेळी राज्यमंत्री दानवे म्हणाले, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुर्बन योजनेंतर्गत परतूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मिनी एमआयडीसी प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज असून, हा प्रकल्प राबविण्यासाठी काही अडचणी असतील तर त्या केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा करून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक विकासकामांसाठी निधी मिळण्याबरोबरच मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यात येते. एमआरईजीएसच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कुशल व अकुशल कामांचा ६०:४० चे परिमाण मेन्टेन राहील, त्याचबरोबर योजनेचा निधी परत जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी दानवे यांनी योजनांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस समितीच्या सर्व अशासकीय सदस्यांसह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.