शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

जालन्यातील मूर्तिकारांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:32 IST

विजय मुंडे । लोकमत न्यूज नेटवर्क जालना : विद्येची देवता असलेल्या गणरायासह अनेक देव-देवता, महापुरूषांच्या मूर्तीला आकार देणा-या राजस्थानी ...

ठळक मुद्देसरकारी शाळेत दाखला : रात्रीच्या अभ्यासाला सौर दिव्याचा आधार; विद्येच्या देवतेची मूर्ती बनविणाऱ्यांच्या पाल्यांची कथा...!

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विद्येची देवता असलेल्या गणरायासह अनेक देव-देवता, महापुरूषांच्या मूर्तीला आकार देणा-या राजस्थानी मूर्तीकारांची दैनंदिनी बिकटच! सरकारी शाळेत शिकणारी मुले शाळा सुटल्यानंतर आई-वडिलांना कामात मदत करतात. तर रात्री सौरदिव्याचा आधार घेऊन अभ्यास करतात. मात्र, सोयी- सुविधांपासून कोसो दूर असलेल्या जालना शहरातील या मूर्तीकारांच्या मुलांचे शैक्षणिक भविष्य अंधारातच आहे.शहरातील देऊळगाव राजा रोडच्या कडेला विजय भाटी, चंपालाल सारंग आणि गिगाराम राठोड हे तीन राजस्थानी मूर्तीकार सहकुटुंब राहतात. गणेश मूर्ती, देवींच्या मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरूषांच्या मूर्ती येथे तयार होतात. शिवाय घराची शोभा वाढविणाºया विविध मूर्त्यांनाही येथे रंग दिला जातो. या मूर्तींच्या विक्रीतून मिळणाºया उत्पन्नावरच या तिन्ही मूर्तीकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.चंपालाल सारंग यांना तीन, विजय भाटी यांना चार, तर गिगाराम राठोड यांना पाच मुले आहेत. विजय भाटी यांची मुले लहान आहेत. तर राठोड यांच्या तीन मुलांसह एक मुलगा शिक्षण घेतो. चंपालाल सारंग यांच्या दोन मुली आणि एक मुलगाही शिक्षण घेतो. या मुला-मुलींचा दाखला सरकारी शाळेत! पालक अशिक्षित आणि परंपरेनुसार मूर्तीकाम करणारे. परिणामी शाळेचे नावही त्यांना आठवेना! मूळ गाव प्रतापगड (जि.पाली, राजस्थान) त्यामुळे बोली भाषा हिंदी आणि राजस्थानी. मुलांचे शिक्षण सरकारी शाळेत. दिवाळीच्या सुटी संपल्यानंतर बुधवारी शाळेची घंटा वाजली होती. मात्र, ही मुले पालकांसमवेत देवदेवतांच्या, महापुरूषांच्या मूर्तींना आकार देण्यात दंग होती! लहान मुले भावंडांसमवेत मस्ती करीत होती. तर एक लहान मुलगा गणरायाच्या मूर्तीसमोर झोळीत झोपलेला. शाळा भरली, पण पुस्तकं नाहीत. शाळेत जे शिकवितात ते घरी येऊन अभ्यास करतो. रात्री सौर दिवा लावून अभ्यास करतो. कधी काम असले तर शाळेला दांडी मारतो, असे बोली भाषेत सांगताना बालकांच्या चेह-यावर निरागस हास्य येत होते. मात्र, पालात असलेले वास्तव्य, शिक्षणासाठी लागणाºया सोयी-सुविधांपासून कोसोदूर असलेल्या या निरागस मुला-मुलींचे शैक्षणिक भविष्य खरेच उज्ज्वल ठरेल का ? हा प्रश्न मात्र निरूत्तरच आहे!

टॅग्स :Jalanaजालनाchildren's dayबालदिनEducationशिक्षण