शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

चौकशी समितीला माहिती देण्यास शिक्षण विभागाची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

६ मे २०१० नंतर पदभरतीस मान्यता देऊ नये, असा शासन निर्णय आहे. असे असतानाही माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरूड यांनी ...

६ मे २०१० नंतर पदभरतीस मान्यता देऊ नये, असा शासन निर्णय आहे. असे असतानाही माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरूड यांनी ६ मे पूर्वीच्या तारखांमध्ये जवळपास ८ ते १० प्रकरणांमध्ये निकष डावलून आणि अर्थपूर्ण व्यवहार करून मान्यता दिल्याचा गंभीर आरोप माजी अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर यांनी केला होता. या सर्व प्रकरणाची एसीबीकडून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान ही गंभीर बाब ओळखून सीईओ अरोरा यांनी मध्यस्ती करत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचेही नमूद केले होते. या चौकशी समितीने शिक्षण विभागाची झाडाझडती सुरू केली असून, मागील वर्षभरात किती शिक्षकांना मान्यता दिल्या आहेत, याची माहिती मागविली आहे. परंतु, शिक्षण विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

त्या प्रकरणावर सुनावणी

६ मे २०१० नंतर पदभरतीस मान्यता दिल्याबद्दल एका शिक्षकाने मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर बुधवारी सुनावणी झाली. यात शिक्षणाधिकारी दोषी आढळल्या नसल्याचे सांगण्यात आले.