शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढीमुळे रिक्षाचालकांना संसाराचा गाडा चालविण्यासाठी करावी लागतेय कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST

जालना : मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत ...

जालना : मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. रिक्षाचालकांना संसाराचा गाडा चालविताना मोेठी कसरत करावी लागत असून, बहुतांश रिक्षाचालक पर्यायी नोकरीचा शोध घेत आहे.

जालना जिल्ह्यात ७२५२ ऑटोरिक्षा आहेत. दिवसभर रिक्षा चालवून त्यातून आलेल्या पैशांतून रिक्षाचालक आपल्या संसाराचा गाडा चालवित असतात. ऐवढ्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नसल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे भाव दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दिवसभर रिक्षा चालवून मिळालेले निम्मे पैसे हे पेट्रोलमध्येच जात असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यामुळे बहुतांश रिक्षाचालक मिळालेल्या वेळेत पर्यायी काम करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका हा रिक्षाचालकांना बसला असून, त्यांना रिक्षा चालविणेही अवघड झाले आहे. शासनाने तत्काळ पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे, अशी मागणी होत आहे.

दिवसभरामध्ये अगोदर १०० ते १५० रुपयांचे पेट्रोल टाकावे लागत असे. आता २०० ते ३०० रुपयांचे पेट्रोल टाकावे लागते. दोन ते तीन लिटर पेट्रोल आता सध्या लागते. कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शेती नसल्यामुळे यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दर दिवसाला एक लिटरमागे पूर्वी २०० रुपये मिळायचे. आता १५० रुपये मिळतात. शासनाने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे.

राजेंद्र संसारे, रिक्षाचालक, अंबड

भोकरदनसारख्या शहरात दिवसभराचा व्यवसाय ३०० रुपये होतो. त्यामध्ये दीड ते दोन लिटर पेट्रोल लागते. त्यामुळे दिवसाकाठी कसेबसे १५० ते २०० रुपये उरतात. कुटुंबातील पाच जणांचा उदरनिर्वाह यावर भागत नाही. त्यामुळे फावल्या वेळेत दुकानात हमाली करून मिळालेल्या पैशातून संसार चालवावा लागत आहे. शासनाने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे.

शेख अन्वर, रिक्षाचालक, भोकरदन

माझे चार जणांचे कुटुंब आहे. सर्वांचा उदरनिर्वाह हा रिक्षावर अवलंबून आहे. मात्र पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे संसाराचा गाडा चालविताना दमछाक होत आहे. २०० रुपये पेट्रोलमध्ये जातात. १५० ते २०० आम्हाला उरतात. त्यामध्ये घर भाडे, किराणा खर्च व मुलांचा दवाखाना करावा लागतो. त्यामुळे काहीच शिल्लक राहत नाही. त्यामध्ये संसार कसा चालवावा? असा प्रश्न निर्माण होत आहे. रिक्षाचालकांना पेन्शन सुरू करावे.

अजिमखान लतिफखान, रिक्षाचालक, भोकरदन