शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

रेल्वेप्रवास नको रे बाबा; दररोज १५० ते १७५ तिकिटे होतात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:32 IST

जालना : मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. जालना रेल्वे ...

जालना : मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. जालना रेल्वे स्थानकातून दररोज ५०० ते ६०० प्रवासी प्रवास करतात. परंतु, कोरोनाच्या भीतीने दररोज १५० ते १७५ तिकिटे रद्द होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जालना येथील रेल्वे स्थानकातून औरंगाबाद, मुंबई, पुणे, परभणी, नांदेड येथे रेल्वेने ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक प्रवाशांनी गजबजलेले असते. परंतु, गतवर्षापासून देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने प्रवाशांची संख्या कमालीची घटली आहे. शिवाय रेल्वे प्रशासनाकडूनही बहुतांश रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने आता प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दररोज १५० ते १७५ प्रवासी आरक्षण रद्द करीत आहेत.

मुंबई, पुण्याची गर्दी ओसरली

जालना रेल्वे स्थानकातून मुंबई, पुणे येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, वाढत्या कोरोनामुळे लोक प्रवास करणे टाळत आहेत. शिवाय मुंबई, पुणे येथे कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लोक मुंबई, पुण्याला जाणे टाळत आहेत.

जालना रेल्वे स्थानकातून दररोज ५०० ते ६०० लोक प्रवास करतात. परंतु, मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. दररोज १५० ते १७५ जण आरक्षण रद्द करीत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.