शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रेल्वेप्रवास नको रे बाबा; दररोज १५० ते १७५ तिकिटे होतात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:32 IST

जालना : मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. जालना रेल्वे ...

जालना : मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. जालना रेल्वे स्थानकातून दररोज ५०० ते ६०० प्रवासी प्रवास करतात. परंतु, कोरोनाच्या भीतीने दररोज १५० ते १७५ तिकिटे रद्द होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जालना येथील रेल्वे स्थानकातून औरंगाबाद, मुंबई, पुणे, परभणी, नांदेड येथे रेल्वेने ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक प्रवाशांनी गजबजलेले असते. परंतु, गतवर्षापासून देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने प्रवाशांची संख्या कमालीची घटली आहे. शिवाय रेल्वे प्रशासनाकडूनही बहुतांश रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने आता प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दररोज १५० ते १७५ प्रवासी आरक्षण रद्द करीत आहेत.

मुंबई, पुण्याची गर्दी ओसरली

जालना रेल्वे स्थानकातून मुंबई, पुणे येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, वाढत्या कोरोनामुळे लोक प्रवास करणे टाळत आहेत. शिवाय मुंबई, पुणे येथे कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लोक मुंबई, पुण्याला जाणे टाळत आहेत.

जालना रेल्वे स्थानकातून दररोज ५०० ते ६०० लोक प्रवास करतात. परंतु, मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. दररोज १५० ते १७५ जण आरक्षण रद्द करीत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.