रब्बीतील पिके धोक्यात
परतूर : थकीत वीजबिलामुळे शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे रब्बीतील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती असून, वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.
अवैध प्रवासी वाहतूक
बदनापूर : शहरासह परिसरात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.
पादचाऱ्यांची गैरसोय
मंठा : शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, याचा पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
रस्ता कामाची मागणी
जालना : शहरातील इंदेवाडी शिवारातील रस्त्याचे काम करावे, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी साई पवार, एम. बी. बोरुडे, ए. बी. गायकवाड, भोजने, बापू गायकवाड आदींची उपस्थिती होती.