शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:29 IST

लोकसभेच्या निवडणुका अद्याप दूर असल्यातरी राजकीय मशागत आतापासून केल्यास त्यावेळी लगीनघाई होणार नाही. ही काळजी घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील आरोप- प्रत्यारोप म्हणजे एक प्रकारे साखर पेरणीच असल्याचे बोलले जात आहे.

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कयंंदा कधी नव्हे तो जून मध्येच चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याने बळीराजा खरीप हंगामाच्या पेरणीसाठीच्या तयारीत गुंतला आहे. तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुका अद्याप दूर असल्यातरी राजकीय मशागत आतापासून केल्यास त्यावेळी लगीनघाई होणार नाही. ही काळजी घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील आरोप- प्रत्यारोप म्हणजे एक प्रकारे साखर पेरणीच असल्याचे बोलले जात आहे.भाजप आणि शिवसेना युती बाबत अद्याप वरिष्ठ पातळीवर कुठलाच निर्णय झालेला नाही. आणि उमेदवार कोण असतील हा प्रश्न तर अद्याप पक्षाच्या पटलावरही नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांतील दानवे आणि खोतकर यांच्यातील शाब्दिक युध्द टोकाला पोहोचले आहे. यामुळे ज्या प्रमाणे मुंबई महानगर पालिका तसेच पालघर निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाने एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून निवडणुका लढवल्या. त्यामुळे तेथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा विषयही जनतेसमोर आला नाही. त्याच धर्तीवर जालना लोकसभा मतदार संघात दानवे व खोतकरांकडून रणनीती आखली जात आहे की, काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. २००९ मध्ये अर्जुन खोतकरांना शिवसेनेने घनसावंगी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती, त्यावेळी देखील खोतकरांनी तेथे आक्रमक प्रचार करून राजेश टोपे यांना मोठी टक्कर दिली होती. त्यानुसारच आता खोतकर हे आक्रमकपणे दानवेंवर तुटून पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातून कोणाचा किती फायदा होणार हे येणारा काळच ठरवेल.युतीचा निर्णय न होताच दानवे आणि खोतकरांमध्येच निवडणूक होणार हे जनतेच्या मनावर बिंबवण्याचे काम आतापासून माध्यमांच्या माध्यमातून होत आहे. या दोघांनी जे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत, त्यात त्यांनी यापूर्वी कधीही कुठल्या जबाबदार शासकीय यंत्रणेकडे एकमेकांच्या विरोधात कधी पुरावे दिल्याचे समोर येत नाही. त्यामुळे मूळ यंत्रणेला बाजूला ठेवून, केवळ माध्यमातून आम्ही दोघे किती एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो आहेत, हे चित्र पध्दतशीरपणे रंगवले जात आहे. त्यामुळे जनतेतून काँग्रेसकडून कोण उभे राहणार, कोणाला उमेदवारी मिळणार या बाबत विचार करण्यास वेळच दिला जाऊ नये हा ही हेतू या आरोप-प्रत्यारोपातून साध्य केला जात असल्याचे वास्तव आहे.एकूणच जालना बाजार समितीची निवडणूक आणि त्यानंतर झालेली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून दानवे व खोतकर यांच्यातील वादाला जास्त धार आली. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या जागावाटपावरूनही बराच खल या दोन नेत्यांमध्ये झाला होता. त्यात तडजोड होऊन युती करून ही निवडणूक लढवली आणि सभापती ऐवजी उपसभापती पदावर रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू भास्कर दानवे यांना देऊन येथे समेट झाली. नंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळावणी करून अध्यक्षपदी अनिरूध्द खोतकर आणि उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे सतीश टोपे यांना संधी मिळाल्याने तर भाजपचा तीळपापड झाला होता.या मुद्यांसह रस्ते विकासाचा शुभारंभ असो की नगराध्यक्षाची निवडणूक; यातून दानवे आणि खोतकरांमधील मतभेद वाढतच गेले. आणि आता तर, त्या दोघांनी एकमेकांच्या ‘अर्थपूर्ण’ उन्नतीचे स्त्रोत सांगून मोठा राजकीय धुरळा उडवून दिला आहे.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकर