शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

जालन्यात वीज वितरण कंपनीचा दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:37 IST

वीजवितरण कंपनीकडून नादूरूस्त ट्रान्सफार्मर देताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतक-यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन दिले असून, यात वानडगाव, देळेगव्हाण, कडेगाव या गावातील संतप्त शेतक-यांनी हे निवेदन देतानाच आत्म दहनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देजालना : मर्जितील शेतकऱ्यांना प्राधान्याचा मुद्दा कळीचा

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीजवितरण कंपनीकडून नादूरूस्त ट्रान्सफार्मर देताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतक-यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन दिले असून, यात वानडगाव, देळेगव्हाण, कडेगाव या गावातील संतप्त शेतक-यांनी हे निवेदन देतानाच आत्म दहनाचा इशारा दिला आहे.जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण तसेच जालना तालुक्यातील वानडगाव आणि बदनापूर तालुक्यातून कडेगाव येथील हे संतप्त शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी धडकले होते. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते डॉ. आप्पासाहेब कदम हे देखील त्यांच्या सोबत होते. त्या शेतकºयांनी सांगितले की, आमच्या गावातील ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर ते दुरूस्तीसाठी वीजवितरण कंपनीकडे पाठविले होते. त्यावेळी महिन्याभरापूर्वी आमची तेथे नोंद असतानाही तेथील अधिकारी आणि कर्मचाºयांनी मिलीभगत करून अर्थपूर्ण व्यवहार करून जे ट्रान्सफार्मर आमच्या नंतर दुरूस्तीसाठी आले होते, त्यांना आमच्या अधी वितरीत केले.आम्ही वीज वितरण कंपनीच्या या धोरणाचा निषेध करत असून, रोस्टरप्रमाणे त्यांनी ते वितरीत का केले नाहीत, असा सवाल केला असता, आॅईल नसल्याचे कारण सांगून आम्हांला तेथून काढून दिले. या सर्व गंभीर प्रकरणाची चौकशी करावी, नसता आम्ही आत्मदहन करू असा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी राजू निंबाळकर, अनिल निंबाळकर, बाबूराव कापसे, भगवान कापसे, किशोर नागवे, अभिमन्यू नागवे तसेच पंडित शिंदे दामोधर नागवे यांच्यासह अन्य २० ते २५ शेतकºयांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. कदम यांनी शेतकºयांना शांत केले.पाण्या अभावी द्राक्षबाग सुकलीगेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अन्य पिकांप्रमाणेच द्राक्ष बागेलाही मोेठा फटका बसला आहे. शेतातील विहीरीत मुबलक पाणी आहे, परंतु गावात वीजपुरवठा नसल्याने ते देता येत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया वानडगाव येथील शेतकºयांनी सांगितली. त्यातच वीजवितरण कंपनीतील भोंगळ आणि अधिकाºयांचे तोंडपाहून मदत करण्या मागील हेतूमुळे आम्ही हतबल झालो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Jalanaजालनाmahavitaranमहावितरण