शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जालन्यात वीज वितरण कंपनीचा दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:37 IST

वीजवितरण कंपनीकडून नादूरूस्त ट्रान्सफार्मर देताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतक-यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन दिले असून, यात वानडगाव, देळेगव्हाण, कडेगाव या गावातील संतप्त शेतक-यांनी हे निवेदन देतानाच आत्म दहनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देजालना : मर्जितील शेतकऱ्यांना प्राधान्याचा मुद्दा कळीचा

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीजवितरण कंपनीकडून नादूरूस्त ट्रान्सफार्मर देताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतक-यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन दिले असून, यात वानडगाव, देळेगव्हाण, कडेगाव या गावातील संतप्त शेतक-यांनी हे निवेदन देतानाच आत्म दहनाचा इशारा दिला आहे.जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण तसेच जालना तालुक्यातील वानडगाव आणि बदनापूर तालुक्यातून कडेगाव येथील हे संतप्त शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी धडकले होते. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते डॉ. आप्पासाहेब कदम हे देखील त्यांच्या सोबत होते. त्या शेतकºयांनी सांगितले की, आमच्या गावातील ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर ते दुरूस्तीसाठी वीजवितरण कंपनीकडे पाठविले होते. त्यावेळी महिन्याभरापूर्वी आमची तेथे नोंद असतानाही तेथील अधिकारी आणि कर्मचाºयांनी मिलीभगत करून अर्थपूर्ण व्यवहार करून जे ट्रान्सफार्मर आमच्या नंतर दुरूस्तीसाठी आले होते, त्यांना आमच्या अधी वितरीत केले.आम्ही वीज वितरण कंपनीच्या या धोरणाचा निषेध करत असून, रोस्टरप्रमाणे त्यांनी ते वितरीत का केले नाहीत, असा सवाल केला असता, आॅईल नसल्याचे कारण सांगून आम्हांला तेथून काढून दिले. या सर्व गंभीर प्रकरणाची चौकशी करावी, नसता आम्ही आत्मदहन करू असा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी राजू निंबाळकर, अनिल निंबाळकर, बाबूराव कापसे, भगवान कापसे, किशोर नागवे, अभिमन्यू नागवे तसेच पंडित शिंदे दामोधर नागवे यांच्यासह अन्य २० ते २५ शेतकºयांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. कदम यांनी शेतकºयांना शांत केले.पाण्या अभावी द्राक्षबाग सुकलीगेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अन्य पिकांप्रमाणेच द्राक्ष बागेलाही मोेठा फटका बसला आहे. शेतातील विहीरीत मुबलक पाणी आहे, परंतु गावात वीजपुरवठा नसल्याने ते देता येत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया वानडगाव येथील शेतकºयांनी सांगितली. त्यातच वीजवितरण कंपनीतील भोंगळ आणि अधिकाºयांचे तोंडपाहून मदत करण्या मागील हेतूमुळे आम्ही हतबल झालो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Jalanaजालनाmahavitaranमहावितरण