शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अपक्षांमुळे बिघडते मतांचे गणित..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:36 IST

अपक्ष उमेदवारांनी आपली आशा आणि अस्तित्व सोडले नसल्याचे गेल्या दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास दिसून येते.

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकशाही स्वीकारलेल्या भारतामध्ये निवडणूक लढविण्याचे अधिकार ज्याप्रमाणे राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आहेत त्यात धर्तीवर अपक्ष उमेदवारांनाही निवडणूक लढण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळेच तुम्ही कुठल्याही पक्षाचे सक्रिय सदस्य नसलात तरी तुम्हाला निवडणुकीत उभे राहता येते.जालना लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास पूर्वीपासूनच मतदारांनी राजकीय पक्षाच्या उमेदवारांनाच आपल्या मतदानाने विजयी केले आहे. हे जरी खरे असले तरी अपक्ष उमेदवारांनी आपली आशा आणि अस्तित्व सोडले नसल्याचे गेल्या दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास दिसून येते. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण २२ उमेदवार रिंंगणात होते. पैकी अपक्षांची संख्या ११ होती. त्यावेळी प्रमुख राजकीय पक्ष अर्थात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात काट्याची टक्कर झाली. त्यावेळी काँग्रेसचे कल्याण काळे यांनी भाजपचे परंपरागत उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांना नाकी नऊ आणले. दानवे हे त्यावेळी केवळ ८ हजार ३०० मतांनी विजयी झाले होते. यावेळी ११ अपक्षांना पडलेल्या मतांचा विचार केल्यास अपक्षांनी आणखी जोर लावला असता तर जालना लोकसभा निवडणुकीचे चित्र वेगळे दिसले असते. अपक्ष उमेदवारांमध्ये जिल्ह्यातील फारसे कोणी प्रतिष्ठित अथवा उच्च शिक्षित उमेदवार नसल्यानेही राजकीय पक्षांचे पितळ पांढरे होत गेले. एकूणच अपक्ष उमेदवार हे उमेदवारी दाखल करतात परंतु, त्यांना अवाढव्य असलेल्या लोकसभा मतदार संघात प्रचाराला फिरताना अनेक आव्हाने असतात. त्यात कार्यकर्त्यांचा अभाव, सक्षम आर्थिक क्षमता आणि कुठल्याही मुद्द्यावर मत मांडायचे झाल्यास मिळणारा प्रतिसाद हा अत्यल्प असतो. त्यामुळे अपक्ष उमेदवार मोठ्या हिमतीने रिंगणात उतरतात परंतु, जनमानसांकडून त्यांना मतांचे दान राजकीय पक्षांच्या तुलनेत खूप कमी दिले जाते. अपक्षांना कमी लेखून चालत नाही. परंतु, काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत आपल्या प्रतिस्पर्धेची मतविभागणी व्हावी म्हणून देखील अपक्षांना अप्रत्यक्षपणे उभे केले जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाPoliticsराजकारण