शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अपक्षांमुळे बिघडते मतांचे गणित..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:36 IST

अपक्ष उमेदवारांनी आपली आशा आणि अस्तित्व सोडले नसल्याचे गेल्या दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास दिसून येते.

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकशाही स्वीकारलेल्या भारतामध्ये निवडणूक लढविण्याचे अधिकार ज्याप्रमाणे राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आहेत त्यात धर्तीवर अपक्ष उमेदवारांनाही निवडणूक लढण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळेच तुम्ही कुठल्याही पक्षाचे सक्रिय सदस्य नसलात तरी तुम्हाला निवडणुकीत उभे राहता येते.जालना लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास पूर्वीपासूनच मतदारांनी राजकीय पक्षाच्या उमेदवारांनाच आपल्या मतदानाने विजयी केले आहे. हे जरी खरे असले तरी अपक्ष उमेदवारांनी आपली आशा आणि अस्तित्व सोडले नसल्याचे गेल्या दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास दिसून येते. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण २२ उमेदवार रिंंगणात होते. पैकी अपक्षांची संख्या ११ होती. त्यावेळी प्रमुख राजकीय पक्ष अर्थात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात काट्याची टक्कर झाली. त्यावेळी काँग्रेसचे कल्याण काळे यांनी भाजपचे परंपरागत उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांना नाकी नऊ आणले. दानवे हे त्यावेळी केवळ ८ हजार ३०० मतांनी विजयी झाले होते. यावेळी ११ अपक्षांना पडलेल्या मतांचा विचार केल्यास अपक्षांनी आणखी जोर लावला असता तर जालना लोकसभा निवडणुकीचे चित्र वेगळे दिसले असते. अपक्ष उमेदवारांमध्ये जिल्ह्यातील फारसे कोणी प्रतिष्ठित अथवा उच्च शिक्षित उमेदवार नसल्यानेही राजकीय पक्षांचे पितळ पांढरे होत गेले. एकूणच अपक्ष उमेदवार हे उमेदवारी दाखल करतात परंतु, त्यांना अवाढव्य असलेल्या लोकसभा मतदार संघात प्रचाराला फिरताना अनेक आव्हाने असतात. त्यात कार्यकर्त्यांचा अभाव, सक्षम आर्थिक क्षमता आणि कुठल्याही मुद्द्यावर मत मांडायचे झाल्यास मिळणारा प्रतिसाद हा अत्यल्प असतो. त्यामुळे अपक्ष उमेदवार मोठ्या हिमतीने रिंगणात उतरतात परंतु, जनमानसांकडून त्यांना मतांचे दान राजकीय पक्षांच्या तुलनेत खूप कमी दिले जाते. अपक्षांना कमी लेखून चालत नाही. परंतु, काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत आपल्या प्रतिस्पर्धेची मतविभागणी व्हावी म्हणून देखील अपक्षांना अप्रत्यक्षपणे उभे केले जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाPoliticsराजकारण