शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

अपक्षांमुळे बिघडते मतांचे गणित..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:36 IST

अपक्ष उमेदवारांनी आपली आशा आणि अस्तित्व सोडले नसल्याचे गेल्या दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास दिसून येते.

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकशाही स्वीकारलेल्या भारतामध्ये निवडणूक लढविण्याचे अधिकार ज्याप्रमाणे राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आहेत त्यात धर्तीवर अपक्ष उमेदवारांनाही निवडणूक लढण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळेच तुम्ही कुठल्याही पक्षाचे सक्रिय सदस्य नसलात तरी तुम्हाला निवडणुकीत उभे राहता येते.जालना लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास पूर्वीपासूनच मतदारांनी राजकीय पक्षाच्या उमेदवारांनाच आपल्या मतदानाने विजयी केले आहे. हे जरी खरे असले तरी अपक्ष उमेदवारांनी आपली आशा आणि अस्तित्व सोडले नसल्याचे गेल्या दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास दिसून येते. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण २२ उमेदवार रिंंगणात होते. पैकी अपक्षांची संख्या ११ होती. त्यावेळी प्रमुख राजकीय पक्ष अर्थात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात काट्याची टक्कर झाली. त्यावेळी काँग्रेसचे कल्याण काळे यांनी भाजपचे परंपरागत उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांना नाकी नऊ आणले. दानवे हे त्यावेळी केवळ ८ हजार ३०० मतांनी विजयी झाले होते. यावेळी ११ अपक्षांना पडलेल्या मतांचा विचार केल्यास अपक्षांनी आणखी जोर लावला असता तर जालना लोकसभा निवडणुकीचे चित्र वेगळे दिसले असते. अपक्ष उमेदवारांमध्ये जिल्ह्यातील फारसे कोणी प्रतिष्ठित अथवा उच्च शिक्षित उमेदवार नसल्यानेही राजकीय पक्षांचे पितळ पांढरे होत गेले. एकूणच अपक्ष उमेदवार हे उमेदवारी दाखल करतात परंतु, त्यांना अवाढव्य असलेल्या लोकसभा मतदार संघात प्रचाराला फिरताना अनेक आव्हाने असतात. त्यात कार्यकर्त्यांचा अभाव, सक्षम आर्थिक क्षमता आणि कुठल्याही मुद्द्यावर मत मांडायचे झाल्यास मिळणारा प्रतिसाद हा अत्यल्प असतो. त्यामुळे अपक्ष उमेदवार मोठ्या हिमतीने रिंगणात उतरतात परंतु, जनमानसांकडून त्यांना मतांचे दान राजकीय पक्षांच्या तुलनेत खूप कमी दिले जाते. अपक्षांना कमी लेखून चालत नाही. परंतु, काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत आपल्या प्रतिस्पर्धेची मतविभागणी व्हावी म्हणून देखील अपक्षांना अप्रत्यक्षपणे उभे केले जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाPoliticsराजकारण