शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

मर्यादा ओलांडली की विनाश अटळ - रामदास आचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:33 IST

कुणीही मर्यादा ओलांडू नये. मग या ठिकाणी तुमचा हेतू कसा आणि काय आहे, याला काहीही अर्थ नसतो, असा हितोपदेश रामदास महाराज आचार्य यांनी येथे बोलताना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लक्ष्मणानं रेषा ओढून सीतेला ती रेषा ओलांडू नका म्हणून सांगितलं. परंतु सीतेनं ते ऐकलं का ? अर्थात लक्ष्मणरेषा ओलांडण्यात सीतेचा हेतू शुध्द आणि चांगला असला तरी विनाश झालाच ना! मनुष्यप्राणी कोणत्याही हेतूने का होईना मर्यादा ओलांडल्याशिवाय राहत नाही म्हणूनच त्याला विनाशाला सामोरे जावे लागते. सांगायचं तात्पर्य असं की कुणीही मर्यादा ओलांडू नये. मग या ठिकाणी तुमचा हेतू कसा आणि काय आहे, याला काहीही अर्थ नसतो, असा हितोपदेश रामदास महाराज आचार्य यांनी येथे बोलताना दिला.सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज स्थापित श्रीराम संस्थान आनंदवाडी जुना जालना येथे श्रीराम जन्म, नवरात्रोत्सव सोहळा आणि संगीतमय रामायण कथेचे निरुपण करताना ते बोलत होते. शुक्रवारी प्रात:कालामध्ये स्नेहल नेवासकर यांचे तर सायंकाळी डॉ. पराग चौधरी यांचे गीतगायन होणार आहे.कालच्या कथेतील थोडक्यात परामर्श घेऊन रामदास महाराज आचार्य म्हणाले की, जानकीची सुरक्षा ही लक्ष्मणाची जबाबदारी होती. ती जबाबदारी चुकू नये म्हणूनच लक्ष्मणाने बाहेर जाण्यापूर्वी पर्णकुटीजवळ लक्ष्मणरेषा ओढून ती न ओलांडण्याची सूचना सीतेला केली होती. कारण काहीही घडू शकते याची कल्पना कदाचित लक्ष्मणाला आली असावी किंवा सीतेच्या सुरक्षेसाठी लक्ष्मणाने रेषेचा पर्याय निवडला असेल. परंतु एवढे सांगूनही जे घडायचे तेच घडले. म्हणून रावणाने सीतेच्या अपहरणाचा पर्याय निवडला अन् त्यातूनच त्याच्या पतनाचा कार्यारंभ झाला असे आचार्य म्हणाले. कार्यक्रमास परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सायंकाळी कीर्तन, भजन होत आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRam Navamiराम नवमी