शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मर्यादा ओलांडली की विनाश अटळ - रामदास आचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:33 IST

कुणीही मर्यादा ओलांडू नये. मग या ठिकाणी तुमचा हेतू कसा आणि काय आहे, याला काहीही अर्थ नसतो, असा हितोपदेश रामदास महाराज आचार्य यांनी येथे बोलताना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लक्ष्मणानं रेषा ओढून सीतेला ती रेषा ओलांडू नका म्हणून सांगितलं. परंतु सीतेनं ते ऐकलं का ? अर्थात लक्ष्मणरेषा ओलांडण्यात सीतेचा हेतू शुध्द आणि चांगला असला तरी विनाश झालाच ना! मनुष्यप्राणी कोणत्याही हेतूने का होईना मर्यादा ओलांडल्याशिवाय राहत नाही म्हणूनच त्याला विनाशाला सामोरे जावे लागते. सांगायचं तात्पर्य असं की कुणीही मर्यादा ओलांडू नये. मग या ठिकाणी तुमचा हेतू कसा आणि काय आहे, याला काहीही अर्थ नसतो, असा हितोपदेश रामदास महाराज आचार्य यांनी येथे बोलताना दिला.सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज स्थापित श्रीराम संस्थान आनंदवाडी जुना जालना येथे श्रीराम जन्म, नवरात्रोत्सव सोहळा आणि संगीतमय रामायण कथेचे निरुपण करताना ते बोलत होते. शुक्रवारी प्रात:कालामध्ये स्नेहल नेवासकर यांचे तर सायंकाळी डॉ. पराग चौधरी यांचे गीतगायन होणार आहे.कालच्या कथेतील थोडक्यात परामर्श घेऊन रामदास महाराज आचार्य म्हणाले की, जानकीची सुरक्षा ही लक्ष्मणाची जबाबदारी होती. ती जबाबदारी चुकू नये म्हणूनच लक्ष्मणाने बाहेर जाण्यापूर्वी पर्णकुटीजवळ लक्ष्मणरेषा ओढून ती न ओलांडण्याची सूचना सीतेला केली होती. कारण काहीही घडू शकते याची कल्पना कदाचित लक्ष्मणाला आली असावी किंवा सीतेच्या सुरक्षेसाठी लक्ष्मणाने रेषेचा पर्याय निवडला असेल. परंतु एवढे सांगूनही जे घडायचे तेच घडले. म्हणून रावणाने सीतेच्या अपहरणाचा पर्याय निवडला अन् त्यातूनच त्याच्या पतनाचा कार्यारंभ झाला असे आचार्य म्हणाले. कार्यक्रमास परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सायंकाळी कीर्तन, भजन होत आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRam Navamiराम नवमी