शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

कोरेगावातील ग्रामस्थांच्या एकीमुळे कोरोना गावातून हद्दपार; लसीकरणावरही दिला भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST

परतूर : ग्रामस्थांनी दाखविलेली एकी, ग्रामपंचायतीने केलेले नियोजन, सर्वपक्षीयांसह प्रशासकीय विभागाची मिळालेली साथ यामुळे कोरेगाव (ता.परतूर) हे गाव कोरोनामुक्त ...

परतूर : ग्रामस्थांनी दाखविलेली एकी, ग्रामपंचायतीने केलेले नियोजन, सर्वपक्षीयांसह प्रशासकीय विभागाची मिळालेली साथ यामुळे कोरेगाव (ता.परतूर) हे गाव कोरोनामुक्त झाले आहे. यापुढेही गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

कोरेगाव येथे कोरोनाचे १९ रुग्ण आढळले होते. मूळ गाव निम्न दुधना प्रकल्पात गेल्याने या गावचे पुनर्वसन झाले आहे. १२०० लोकसंख्या असलेल्या नवीन कोरेगाव वस्तीवर कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे गावच्या सीमा बंद करून आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. सरपंच तथा पं.स सदस्य कांचन दादाराव खोसे, उपसरपंच रामेश्वर टेकाळे, ग्रामसेवक प्रकाश गजभारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी.आर. नवल, गटविकास अधिकारी सुरडकर, पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, डाॅ. सय्यद जाहेद, विस्तार अधिकारी प्रवीण नाकले, ग्रामसेवक प्रकाश गजभारे यांच्यासह ग्रामस्थ, सर्वपक्षीयांनी एकत्रित काम केल्याने गाव कोरोनामुक्त झाले आहे.

कोरोनाच्या लढ्यात ग्रामस्थांनी दिलेली साथ महत्त्वाची ठरली आहे. गाव स्वच्छतेवर ग्रामपंचायतीने अधिकचा भर दिला. शिवाय सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. नागरिकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात आली.

- कांचन दादाराव खोसे, सरपंच

गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील सर्वांचेच योगदान महत्त्वाचे आहे. प्रशासकीय विभागांनीही गावाकडे विशेष लक्ष देऊन उपाययोजना केल्या आहेत. गावातील लसीकरण वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

-रामेश्वर टेकाळे, उपसरपंच

वरिष्ठांच्या सूचनेनुसार गावात विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपाययोजना आणि सूचनांचे ग्रामस्थांनी पालन केले. त्यामुळे गाव कोरोनामुक्त झाले आहे. यापुढेही दक्षतेसाठी विविध उपाय राबविले जाणार आहेत.

-प्रकाश गजभारे, ग्रामसेवक

सर्वांच्या प्रयत्नातून कोरेगाव कोरोनामुक्त झाले आहे. असे असले तरी ग्रामस्थांनी सूचनांचे पालन करावे. वेळेत लसीकरण करून घ्यावे. -डॉ. डी. आर. नवल,

तालुका आरोग्य अधिकारी

ग्रामपंचायतीने असे केले प्रयत्न

बाधित रूग्ण आढळल्यानंतर गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या. संपर्कातील ग्रामस्थांचा शोध घेऊन उपचार करण्यात आले.

ग्रामस्थांच्या वेळोवेळी बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली. कोरोनाच्या लढ्यात आजवर गावात ८० टक्के लसीकरणही पूर्ण झाले आहे.­