शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावातील ग्रामस्थांच्या एकीमुळे कोरोना गावातून हद्दपार; लसीकरणावरही दिला भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST

परतूर : ग्रामस्थांनी दाखविलेली एकी, ग्रामपंचायतीने केलेले नियोजन, सर्वपक्षीयांसह प्रशासकीय विभागाची मिळालेली साथ यामुळे कोरेगाव (ता.परतूर) हे गाव कोरोनामुक्त ...

परतूर : ग्रामस्थांनी दाखविलेली एकी, ग्रामपंचायतीने केलेले नियोजन, सर्वपक्षीयांसह प्रशासकीय विभागाची मिळालेली साथ यामुळे कोरेगाव (ता.परतूर) हे गाव कोरोनामुक्त झाले आहे. यापुढेही गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

कोरेगाव येथे कोरोनाचे १९ रुग्ण आढळले होते. मूळ गाव निम्न दुधना प्रकल्पात गेल्याने या गावचे पुनर्वसन झाले आहे. १२०० लोकसंख्या असलेल्या नवीन कोरेगाव वस्तीवर कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे गावच्या सीमा बंद करून आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. सरपंच तथा पं.स सदस्य कांचन दादाराव खोसे, उपसरपंच रामेश्वर टेकाळे, ग्रामसेवक प्रकाश गजभारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी.आर. नवल, गटविकास अधिकारी सुरडकर, पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, डाॅ. सय्यद जाहेद, विस्तार अधिकारी प्रवीण नाकले, ग्रामसेवक प्रकाश गजभारे यांच्यासह ग्रामस्थ, सर्वपक्षीयांनी एकत्रित काम केल्याने गाव कोरोनामुक्त झाले आहे.

कोरोनाच्या लढ्यात ग्रामस्थांनी दिलेली साथ महत्त्वाची ठरली आहे. गाव स्वच्छतेवर ग्रामपंचायतीने अधिकचा भर दिला. शिवाय सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. नागरिकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात आली.

- कांचन दादाराव खोसे, सरपंच

गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील सर्वांचेच योगदान महत्त्वाचे आहे. प्रशासकीय विभागांनीही गावाकडे विशेष लक्ष देऊन उपाययोजना केल्या आहेत. गावातील लसीकरण वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

-रामेश्वर टेकाळे, उपसरपंच

वरिष्ठांच्या सूचनेनुसार गावात विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपाययोजना आणि सूचनांचे ग्रामस्थांनी पालन केले. त्यामुळे गाव कोरोनामुक्त झाले आहे. यापुढेही दक्षतेसाठी विविध उपाय राबविले जाणार आहेत.

-प्रकाश गजभारे, ग्रामसेवक

सर्वांच्या प्रयत्नातून कोरेगाव कोरोनामुक्त झाले आहे. असे असले तरी ग्रामस्थांनी सूचनांचे पालन करावे. वेळेत लसीकरण करून घ्यावे. -डॉ. डी. आर. नवल,

तालुका आरोग्य अधिकारी

ग्रामपंचायतीने असे केले प्रयत्न

बाधित रूग्ण आढळल्यानंतर गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या. संपर्कातील ग्रामस्थांचा शोध घेऊन उपचार करण्यात आले.

ग्रामस्थांच्या वेळोवेळी बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली. कोरोनाच्या लढ्यात आजवर गावात ८० टक्के लसीकरणही पूर्ण झाले आहे.­