शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

गारपिटीच्या नुकसानीपोटी शासनाकडे ९३ लाख रुपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST

जालना : जिल्ह्यात गत महिन्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. या गारपिटीचा जिल्ह्यातील ८८ हेक्टरवरील पिकांना ३३ टक्क्यांपेक्षा ...

जालना : जिल्ह्यात गत महिन्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. या गारपिटीचा जिल्ह्यातील ८८ हेक्टरवरील पिकांना ३३ टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसला आहे, तर ६०७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाने पंचनामे करून प्रशासनाकडे अहवाल सादर केला असून, झालेल्या नुकसानीपोटी प्रशासनाने ९३ लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद व बदनापूर तालुक्यात १८ फेब्रुवारी रोजी वादळीवाऱ्यासह गारपीट झाली होती. या गारपिटीचा सर्वाधिक फटका भोकरदन तालुक्यातील मालखेडा, ठालेवाडी, इब्राहिमपूर, भोकरदन, नांजा, सुभानपूर गावांना बसला होता. यात फळबागा व हरभरा, मका, गहू, कांदा सीड्स‌चे अतोनात नुकसान झाले होते. शासनाकडून नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश मिळाल्यानंतर महसूल, कृषी विभागाकडून संयुक्त पंचनामे केले. त्यानंतर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला. या अहवालात जिल्ह्यातील ६८८ शेतकऱ्यांच्या ८८ हेक्टवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, तर ९४८ शेतकऱ्यांच्या ६०७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले असल्याचे अवाहलात नमूद करण्यात आले आहे. यात कांदा सीड्स पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शिवाय वीज पडल्याने एकाचा मृत्यूही झाला होता. झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडे ९३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ११ लाख ८८ हजार रुपयांची, तर ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ८२ लाख पाच हजार ७०५ रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात गाटपिटीचा ८८ हेक्टरवरील पिकांना ३३ टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसला आहे, तर ६०७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडे ९३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

-विजय माईनकर, कृषी उपसंचालक, जालना

===Photopath===

040321\04jan_3_04032021_15.jpg

===Caption===

भोकरदन