शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

गारपिटीच्या नुकसानीपोटी शासनाकडे ९३ लाख रुपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST

जालना : जिल्ह्यात गत महिन्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. या गारपिटीचा जिल्ह्यातील ८८ हेक्टरवरील पिकांना ३३ टक्क्यांपेक्षा ...

जालना : जिल्ह्यात गत महिन्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. या गारपिटीचा जिल्ह्यातील ८८ हेक्टरवरील पिकांना ३३ टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसला आहे, तर ६०७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाने पंचनामे करून प्रशासनाकडे अहवाल सादर केला असून, झालेल्या नुकसानीपोटी प्रशासनाने ९३ लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद व बदनापूर तालुक्यात १८ फेब्रुवारी रोजी वादळीवाऱ्यासह गारपीट झाली होती. या गारपिटीचा सर्वाधिक फटका भोकरदन तालुक्यातील मालखेडा, ठालेवाडी, इब्राहिमपूर, भोकरदन, नांजा, सुभानपूर गावांना बसला होता. यात फळबागा व हरभरा, मका, गहू, कांदा सीड्स‌चे अतोनात नुकसान झाले होते. शासनाकडून नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश मिळाल्यानंतर महसूल, कृषी विभागाकडून संयुक्त पंचनामे केले. त्यानंतर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला. या अहवालात जिल्ह्यातील ६८८ शेतकऱ्यांच्या ८८ हेक्टवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, तर ९४८ शेतकऱ्यांच्या ६०७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले असल्याचे अवाहलात नमूद करण्यात आले आहे. यात कांदा सीड्स पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शिवाय वीज पडल्याने एकाचा मृत्यूही झाला होता. झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडे ९३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ११ लाख ८८ हजार रुपयांची, तर ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ८२ लाख पाच हजार ७०५ रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात गाटपिटीचा ८८ हेक्टरवरील पिकांना ३३ टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसला आहे, तर ६०७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडे ९३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

-विजय माईनकर, कृषी उपसंचालक, जालना

===Photopath===

040321\04jan_3_04032021_15.jpg

===Caption===

भोकरदन