शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

दोन नगरसेवकांच्या निर्णयामुळे इच्छुकांमध्ये कही खूशी कही गम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:35 IST

सध्याची स्थिती जालन्यात कायम : एक प्रभाग एक नगरसेवकावर अधिक भर लोकमत न्यूज नेटवर्क जालना : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ...

सध्याची स्थिती जालन्यात कायम : एक प्रभाग एक नगरसेवकावर अधिक भर

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ज्या ज्यावेळी नगरपालिका, महापालिका निवडणुका घेतात. त्यावेळी प्रभाग रचनेवर बदल करण्यावरून खल सुरू होतो. याहीवेळी असेच झाले. आधी या सरकारने एक प्रभाग एक नगरसेवक असे धोरण राहील, याचे संकेत दिले होते. परंतु नंतर यात बदल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील पालिकांचा विचार करता अ वर्ग नगरपालिका म्हणून केवळ जालना नगर पालिका आहे. उर्वरित अंबड, भोकरदन आणि परतूर या ब वर्गामध्ये मोडतात. त्यामुळे येथेही प्रत्येक प्रभागातून दोन जणांना गेल्या निवडणुकीत संधी मिळाली होती. हाच निर्णय याहीवेळी कायम राहिला आहे. यामुळे याचे संमिश्र पद्धतीने स्वागत होत आहे.

मध्यंतरी २००१मध्ये आणि नंतर २०१६मध्ये जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला होता. आता नगराध्यक्षांची निवड ही नगरसेवकांमधून होणार की, पुन्हा जनतेतून याबद्दल मात्र, स्पष्टता दिसत नसून, नगरसेवकांमधूनच ही निवड होईल, अशी अधिक शक्यता आहे.

पालिकेतील

सध्याची स्थिती

जालना पालिकेत सध्या ६३ नगरसेवक आहेत. याहीवेळी प्रभाग रचना असून, प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक राहणार आहेत. केवळ प्रभागातील आरक्षण आणि प्रभागांचा आकार कसा राहील, याबद्दल मात्र, अद्याप निश्चित ठरले नाही. त्यामुळे अनेकांची मोर्चेबांधणी सुरू आहे.

आता अशी असेल पालिकेतील स्थिती

जालना पालिकेतील प्रभागांच्या फेररचनेचा कार्यक्रम सध्या चारही नगर पालिकांमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी तसेच आयुक्तांच्या मंजुरीसाठी तो पाठवावा लागतो. त्यामुळे ही मंजुरी आल्यावरच स्थिती स्पष्ट होईल.

एका मतदाराला दोघांना द्यावे लागणार मत

गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही एका मतदाराला दोन उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. हे दोन उमेदवार नेमके कोण असतील, हे उमेदवारी जाहीर होऊन अर्ज मागे घेतल्यानंतर स्पष्ट होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक म्हणजे विकासाला खीळ असून, प्रभागातील कामेही आपणच केल्याचे यामुळे सांगावे लागणार आहे. - संध्या देठे

बहुसदस्यीय प्रभाग रचनेतून विकासाची स्पर्धा निर्माण होते. कामे कोणी केली, हे नागरिकांना चांगलेच माहीत असते. - अशोक पांगारकर

नगर पालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी राज्य सरकारने निर्णय घेताना बराच गोंधळ घातला. परंतु शेवटी मुंबई सोडून अन्यत्र एक प्रभाग दोन नगरसेवक या निर्णयावर ठाम राहिले. जालना शहरातही हाच नियम लागू राहणार आहे. त्यामुळे कुठलाच बदल झाला नसल्याने जैसे थे परिस्थिती राहणार आहे.

- राजेश राऊत, भाजप

राज्यातील आघाडी सरकारने प्रभाग रचनेमध्ये दोन उमेदवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून, यातून वार्डातील विकासकामे करताना दोन वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक असले तरी त्यांच्यात चुरस निर्माण होऊन प्रभाग विकास गतीने होऊ शकतो.

- नंदकुमार जांगडे, राकाँ.

राज्य सरकारने बऱ्याच विचारानंतर एक प्रभाग दोन नगरसेवक हा जुनाच निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे जालन्यात गेल्या वेळेप्रमाणे स्थिती राहणार आहे. याचा फायदा नेमका कुठल्या पक्षाला होईल, हे आताच सांगणे कठीण असले तरी नागरिक सजग असतात. त्यामुळे ते विकास करणाऱ्यांनाच प्राधान्य देतात.

- शेख महेमूद, काँग्रेस

सरकारने जो निर्णय घेतला आहे तो मान्यच करावा लागतो. दूरवरचा विचार करून सरकारने एक प्रभाग दोन नगरसेवक असा जुनाच निर्णय किमान नगर पालिकांसाठी कायम ठेवला आहे. यामुळे या निर्णयाचे स्वागत करूनच आपल्याला आतापासून नियोजन केल्यास त्याचा लाभ होऊ शकतो.

- विष्णू पाचफुले, शिवसेना