शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

स्कूल बस, रिक्षातून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:08 IST

शहर वाहतूक शाखा तसेच रिक्षा, स्कूलबसचालक आणि पालकांची संयुक्त बैठक सोमवारी येथील राष्ट्रीय हिंदी महाविद्यालयात पार पडली. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा होऊन रिक्षातून विद्यार्थ्यांची होणाऱ्या वाहतुकीवर पायबंद आणला पाहिजे यावर एकमत झाले आहे. मात्र, यातून रिक्षा चालकांच्या पोटावर पाय देण्याचा वाहतूक शाखेचा हेतू नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहर वाहतूक शाखा तसेच रिक्षा, स्कूलबसचालक आणि पालकांची संयुक्त बैठक सोमवारी येथील राष्ट्रीय हिंदी महाविद्यालयात पार पडली. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा होऊन रिक्षातून विद्यार्थ्यांची होणाऱ्या वाहतुकीवर पायबंद आणला पाहिजे यावर एकमत झाले आहे. मात्र, यातून रिक्षा चालकांच्या पोटावर पाय देण्याचा वाहतूक शाखेचा हेतू नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.गेल्या काही महिन्यांमध्ये शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी नव्याने रूजू झालेले वाहतूक शाखेचे निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या सूचनेवरून या बैठकीचे आयोजन केल्याचे सांगण्यात आले. आजच्या बैठकीत परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक काटकर, मुख्याध्यापिका रिना टंडन, डॉ. कैलास सचदेव यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.या बैठकीत पोलीस निरीक्षक काकडे यांनी सांगितले की, जालना हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. येथे मोठ्या प्रमाणावर लोकांची ये-जा असते. त्यातच आता वाहनांची संख्या पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे. त्यातच पार्किंगसाठी आवश्यक असणाºया जागाही अपु-या पडत आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा मुद्दा ज्वलंत विषय बनला आहे.मुलांना शाळेत तसेच शाळेतून घरी सुरक्षितपणे नेताना रिक्षा तसेच स्कूलबस चालकांची मोठी कसरत होते. हे टाळण्यासाठी शिस्त लावणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.यावेळी काटकर यांनी देखील वाहतुकी संदर्भात मार्गदर्शन केले. एका रिक्षातून जेवढे विद्यार्थी व्यवस्थित बसतील तेवढेच न्यावेत असे ते म्हणाले. डॉ. सचदेव यांनी देखील या वाहतूक शाखेच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थेला सुरळीत करण्यासाठी जालनेकरांनी शिस्त पाळणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पालकांनी देखील यावेळी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसroad safetyरस्ते सुरक्षा