लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : पैठण येथे नाथषष्ठीनिमित्त पायी दिंडीत निघालेले येथील वारकरी गुलाबराव भागाजी पुंगळे (६५) चित्तेपिंपळगाव येथे ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली.भोकरदन तालुक्यातील खामखेडा येथील वारकरी दरवर्षी पैैठण येथील नाथषष्ठीला पायी दिंडी घेवून जातात. यामधे राजूर येथील गुलाबराव पुंगळे यांचा समावेश होता. पुंगळे दरवर्षी पैठण येथील नाथषष्ठी व पंढरपूरच्या आषाढी वारीला पायी जात. यावर्षी सुध्दा खामखेड्याच्या दिंडीत त्यांनी सहभागी घेतला होता. शनिवारी औैरंगाबाद तालुक्यातील चित्तेपिंपळगांव येथे दिंडीचा मुक्काम होता. रात्री वारकरी पुंगळे यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांच्या सहका-यांनी त्यांच्यावर तात्पुरता उपचार केला. मात्र रात्रीतूनच ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे झोपेतच निधन झाले. रविवारी राजूरच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
राजूरच्या वारक-याचा दिंडीत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:24 IST