शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

चार लाख ८० हजार हेक्टर पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:24 IST

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जालना : परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.खरीप हंगामाच्या प्रारंभी कमी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. असे असताना मध्यंतरी पिकांच्या वाढीसाठी पाहिजे तसा पाऊस झाल्याने पिके जोमात होती. असे असतानाच अचानक आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडविली. शेतात खळे करून आता माल बाजारात नेऊन त्याचे पैसे होतील, अशी स्वप्नं बळीराजा रंगवत होता. परंतु, या स्वप्नांवर परतीच्या पावसाने पाणी फेरले.या परतीच्या पावसाच्या फटक्यामुळे सर्वात जास्त नुकसान हे सोयाबीन आणि मका पिकाचे झाले असल्याचे पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. सोमवारी जिल्हा प्रशासनाने याचा आढावा घेतला. यावेळी काही तालुक्यातील पंचनाम्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याने त्याची आकडेवारी नव्याने जुळवाजुळव केली जात आहे. बुधवारपर्यंत नुकसानीचे निश्चित क्षेत्र आणि त्याची किंमत काढून अहवाल तयार केला जाणार आहे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र