शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

दररोज धोकादायक कसरती!

By admin | Updated: May 6, 2014 12:12 IST

रेल्वे उड्डाणपूल : चिमुकल्यांपासून महिला ओलांडताहेत रूळ

जालना : उड्डाणपुलाजवळील वसाहतीतील मुलाबाळांसह महिला व नागरिक दैनंदिन कामांसाठी रेल्वे गेटचा वापर करण्याऐवजी थेट रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या जीवघेण्या कसरती करू लागले आहेत. रेल्वेस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर वसाहती स्थिरावल्या आहेत. विशेषत: रेल्वे स्थानकाच्या पलिकडील बाजुस आनंद नगर, बँक कॉलनी, जमुना नगर, विद्युत कॉलनी, एस.बी. कॉलनी वगैरे कॉलन्या लगतच स्थिरावल्या आहेत. येथील हजारो नागरिकांना जुना किंवा नवीन जालन्यात कामानिमित्त ये-जा करण्याकरीता रेल्वे मार्ग ओलांडल्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे हे नागरिक प्लॅटफॉर्म लगतच्या रेल्वे गेटचा वापर करीत आहेत. परंतु रेल्वे उड्डाणपुलाजवळील मंमादेवी नगर, कांचन नगर, शिवनगर, आनंदवाडी, राहूल नगर आदी अगदी रेल्वे मार्गालगतच विसावलेल्या वसाहतींमधील नागरिक उड्डाणपुला लगतच रेल्वेगेट असतांनासुद्धा ते गेट वापरण्याऐवजी उड्डाणपुलाखालील थेट रेल्वेमार्गच ओलांडण्याच्या जीवघेण्या कसरती करत आहेत. जालना ते औरंगाबाद या रेल्वेमार्गावर दररोज पॅसेंजर, एक्सप्रेस किंवा मालवाहू वगैरे ५० गाड्या धावतात. त्यामुळे हे दोन्ही रेल्वे गेट वाहतुकीसाठी वारंवार बंद करावे लागते. त्यामुळेच हे दोन्ही गेट खुले होण्याची प्रतीक्षा न करताच या परिसरातील नागरिक मोकळ्या जागेतून थेट रेल्वे रूळ ओलांडूनच ये-जा करू लागले आहेत. चिमुकल्यांपासून ते शालेय विद्यार्थी दररोज रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करीत आहत. विद्यार्थीनीसुद्धा सायकल किंवा वाहने हे रूळ ओलांडून पुढे नेत आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या या दररोजच्या कसरती धोकादायक ठरू लागल्या आहेत. यातच आता महिलांनीसुद्धा आघाडी घेतली आहे. पिण्याचे पाणी आणण्यासह कपडे धुण्याच्या निमित्ताने महिलाही सर्रास रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करू लागल्या आहेत. वर्षानुवर्षापासून हे धोकादायक प्रकार सुरू असतांनासुद्धा त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही, हे विशेष आहे. (प्रतिनिधी)

घटनेचा काहीही परिणाम नाही

४गेल्या पंधरा दिवसापूर्वी रेल्वे मार्गाजवळ खेळणार्‍या एका चिमुकल्यास गाडी येत असल्याचेभान राहिले नाही. गाडी दिसली तेव्हा त्याने जिवाच्या आकांताने रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. परंतु पाय अडकल्याने तो गाडीखाली सापडला. त्यात त्याचा नाहक बळी गेला. या खळबळजनक घटनेपासून घबराट पसरली आहे. परंतु, त्यातून कुणीही बोध घेतला नाही.

४उड्डाणपुलाजवळील या रेल्वेमार्गाजवळ लोखंडी गेटचे कुंपन उभारणे गरजेचे आहे. गेटजवळ कठडे बसविण्यात आले आहेत. परंतु काही ठिकाणी मोकळी जागा आहे. त्याचाच उपयोग हे नागरिक ये-जा करण्यासाठी करू लागले आहेत.