शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
4
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
5
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
6
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
7
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
8
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
9
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
10
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
11
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
12
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
13
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
14
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
15
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
16
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
17
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
18
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
19
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
20
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

दररोज धोकादायक कसरती!

By admin | Updated: May 6, 2014 12:12 IST

रेल्वे उड्डाणपूल : चिमुकल्यांपासून महिला ओलांडताहेत रूळ

जालना : उड्डाणपुलाजवळील वसाहतीतील मुलाबाळांसह महिला व नागरिक दैनंदिन कामांसाठी रेल्वे गेटचा वापर करण्याऐवजी थेट रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या जीवघेण्या कसरती करू लागले आहेत. रेल्वेस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर वसाहती स्थिरावल्या आहेत. विशेषत: रेल्वे स्थानकाच्या पलिकडील बाजुस आनंद नगर, बँक कॉलनी, जमुना नगर, विद्युत कॉलनी, एस.बी. कॉलनी वगैरे कॉलन्या लगतच स्थिरावल्या आहेत. येथील हजारो नागरिकांना जुना किंवा नवीन जालन्यात कामानिमित्त ये-जा करण्याकरीता रेल्वे मार्ग ओलांडल्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे हे नागरिक प्लॅटफॉर्म लगतच्या रेल्वे गेटचा वापर करीत आहेत. परंतु रेल्वे उड्डाणपुलाजवळील मंमादेवी नगर, कांचन नगर, शिवनगर, आनंदवाडी, राहूल नगर आदी अगदी रेल्वे मार्गालगतच विसावलेल्या वसाहतींमधील नागरिक उड्डाणपुला लगतच रेल्वेगेट असतांनासुद्धा ते गेट वापरण्याऐवजी उड्डाणपुलाखालील थेट रेल्वेमार्गच ओलांडण्याच्या जीवघेण्या कसरती करत आहेत. जालना ते औरंगाबाद या रेल्वेमार्गावर दररोज पॅसेंजर, एक्सप्रेस किंवा मालवाहू वगैरे ५० गाड्या धावतात. त्यामुळे हे दोन्ही रेल्वे गेट वाहतुकीसाठी वारंवार बंद करावे लागते. त्यामुळेच हे दोन्ही गेट खुले होण्याची प्रतीक्षा न करताच या परिसरातील नागरिक मोकळ्या जागेतून थेट रेल्वे रूळ ओलांडूनच ये-जा करू लागले आहेत. चिमुकल्यांपासून ते शालेय विद्यार्थी दररोज रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करीत आहत. विद्यार्थीनीसुद्धा सायकल किंवा वाहने हे रूळ ओलांडून पुढे नेत आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या या दररोजच्या कसरती धोकादायक ठरू लागल्या आहेत. यातच आता महिलांनीसुद्धा आघाडी घेतली आहे. पिण्याचे पाणी आणण्यासह कपडे धुण्याच्या निमित्ताने महिलाही सर्रास रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करू लागल्या आहेत. वर्षानुवर्षापासून हे धोकादायक प्रकार सुरू असतांनासुद्धा त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही, हे विशेष आहे. (प्रतिनिधी)

घटनेचा काहीही परिणाम नाही

४गेल्या पंधरा दिवसापूर्वी रेल्वे मार्गाजवळ खेळणार्‍या एका चिमुकल्यास गाडी येत असल्याचेभान राहिले नाही. गाडी दिसली तेव्हा त्याने जिवाच्या आकांताने रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. परंतु पाय अडकल्याने तो गाडीखाली सापडला. त्यात त्याचा नाहक बळी गेला. या खळबळजनक घटनेपासून घबराट पसरली आहे. परंतु, त्यातून कुणीही बोध घेतला नाही.

४उड्डाणपुलाजवळील या रेल्वेमार्गाजवळ लोखंडी गेटचे कुंपन उभारणे गरजेचे आहे. गेटजवळ कठडे बसविण्यात आले आहेत. परंतु काही ठिकाणी मोकळी जागा आहे. त्याचाच उपयोग हे नागरिक ये-जा करण्यासाठी करू लागले आहेत.