शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दररोज धोकादायक कसरती!

By admin | Updated: May 6, 2014 12:12 IST

रेल्वे उड्डाणपूल : चिमुकल्यांपासून महिला ओलांडताहेत रूळ

जालना : उड्डाणपुलाजवळील वसाहतीतील मुलाबाळांसह महिला व नागरिक दैनंदिन कामांसाठी रेल्वे गेटचा वापर करण्याऐवजी थेट रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या जीवघेण्या कसरती करू लागले आहेत. रेल्वेस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर वसाहती स्थिरावल्या आहेत. विशेषत: रेल्वे स्थानकाच्या पलिकडील बाजुस आनंद नगर, बँक कॉलनी, जमुना नगर, विद्युत कॉलनी, एस.बी. कॉलनी वगैरे कॉलन्या लगतच स्थिरावल्या आहेत. येथील हजारो नागरिकांना जुना किंवा नवीन जालन्यात कामानिमित्त ये-जा करण्याकरीता रेल्वे मार्ग ओलांडल्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे हे नागरिक प्लॅटफॉर्म लगतच्या रेल्वे गेटचा वापर करीत आहेत. परंतु रेल्वे उड्डाणपुलाजवळील मंमादेवी नगर, कांचन नगर, शिवनगर, आनंदवाडी, राहूल नगर आदी अगदी रेल्वे मार्गालगतच विसावलेल्या वसाहतींमधील नागरिक उड्डाणपुला लगतच रेल्वेगेट असतांनासुद्धा ते गेट वापरण्याऐवजी उड्डाणपुलाखालील थेट रेल्वेमार्गच ओलांडण्याच्या जीवघेण्या कसरती करत आहेत. जालना ते औरंगाबाद या रेल्वेमार्गावर दररोज पॅसेंजर, एक्सप्रेस किंवा मालवाहू वगैरे ५० गाड्या धावतात. त्यामुळे हे दोन्ही रेल्वे गेट वाहतुकीसाठी वारंवार बंद करावे लागते. त्यामुळेच हे दोन्ही गेट खुले होण्याची प्रतीक्षा न करताच या परिसरातील नागरिक मोकळ्या जागेतून थेट रेल्वे रूळ ओलांडूनच ये-जा करू लागले आहेत. चिमुकल्यांपासून ते शालेय विद्यार्थी दररोज रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करीत आहत. विद्यार्थीनीसुद्धा सायकल किंवा वाहने हे रूळ ओलांडून पुढे नेत आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या या दररोजच्या कसरती धोकादायक ठरू लागल्या आहेत. यातच आता महिलांनीसुद्धा आघाडी घेतली आहे. पिण्याचे पाणी आणण्यासह कपडे धुण्याच्या निमित्ताने महिलाही सर्रास रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करू लागल्या आहेत. वर्षानुवर्षापासून हे धोकादायक प्रकार सुरू असतांनासुद्धा त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही, हे विशेष आहे. (प्रतिनिधी)

घटनेचा काहीही परिणाम नाही

४गेल्या पंधरा दिवसापूर्वी रेल्वे मार्गाजवळ खेळणार्‍या एका चिमुकल्यास गाडी येत असल्याचेभान राहिले नाही. गाडी दिसली तेव्हा त्याने जिवाच्या आकांताने रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. परंतु पाय अडकल्याने तो गाडीखाली सापडला. त्यात त्याचा नाहक बळी गेला. या खळबळजनक घटनेपासून घबराट पसरली आहे. परंतु, त्यातून कुणीही बोध घेतला नाही.

४उड्डाणपुलाजवळील या रेल्वेमार्गाजवळ लोखंडी गेटचे कुंपन उभारणे गरजेचे आहे. गेटजवळ कठडे बसविण्यात आले आहेत. परंतु काही ठिकाणी मोकळी जागा आहे. त्याचाच उपयोग हे नागरिक ये-जा करण्यासाठी करू लागले आहेत.