शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

संतांच्या प्रेरणेमुळेच संस्कृती टिकून- सुरेश जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:53 IST

हल्ले आणि संकटे येऊनही त्या- त्या काळातील संत महात्म्यांनी जी प्रेरणा समाजजागृतीसाठी केली त्यामुळेच आज आपण टिकून असल्याचे मत सुरेश जोशी यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भारतावर अनेक आक्रमणे झाली. त्यामध्ये भारतीय संस्कृती नष्ट व्हायला हवी होती. परंतु, असे हल्ले आणि संकटे येऊनही त्या- त्या काळातील संत महात्म्यांनी जी प्रेरणा समाजजागृतीसाठी केली त्यामुळेच आज आपण टिकून असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह सुरेश जोशी यांनी व्यक्त केले.घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे शनिवारी जोशी यांच्यासह काडीतीर्थेश्वर महाराजांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पुढे बोलताना जोशी म्हणाले, समर्थ रामदास, सम्राट अशोक, आर्य चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी त्या काळात जी अध्यात्मिक शक्ती समाजाला दिली ती खूप मोठी होती. तिचे जपण्याचे काम चैतन्य पिठाकडून हाती घेण्यात आल्याने आपण समाधानी आहोत. यात सर्व समाज बांधवांनी हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आपली संस्कृती किती जुनी आहे, याचे उदाहरण त्यांनी लोणार येथील प्राचीन मंदिरांचे देऊन विशद केले. यावेळी विनायक देशपांडे, विनायक दसरे, चैतन्य ज्ञानपीठाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कळमळकर, समर्थ रामदास स्वामी श्रीराम दर्शन समितीचे अध्यक्ष विनायक देहेडकर, महेश कवठेकर, सूर्यकांत कुलकर्णी, मोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे