शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातील संकट, कानांना बुरशी, बॅक्टेरियाचाही धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST

कोरोनामुळे सर्वसामान्याची झोप उडाली आहे. त्यात आता अनेकांच्या कानाला बुरशी, बॅक्टेरियाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अस्वच्छ ...

कोरोनामुळे सर्वसामान्याची झोप उडाली आहे. त्यात आता अनेकांच्या कानाला बुरशी, बॅक्टेरियाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अस्वच्छ पाण्यात पोहणे, कानात पाणी राहिल्याने ओल राहणे, सतत हेडफोनचा वापर केल्याने कानात ओलावा निर्माण होऊ नंतर कान दुखण्यासह इतर त्रास होऊ लागताे. त्यामुळे कानाला खाज येण्यासह कमी ऐकू येण्याचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांनीही कानाला होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करणे अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कानाचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर पुढील शारीरिक त्रास टाळण्यासाठी वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

काय घ्याल काळजी?

कान नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवावेत. विशेषत: अंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान तातडीने कोरडे करावेत. हेडफोन वापरत असाल तर तो वारंवार निर्जंतुक करावा. कानातील मळ काढताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच प्रक्रिया करावी.

मधुमेहाचा त्रास असलेल्या आणि कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी कानात ओलावा राहू नये, याची अधिक काळजी घ्यावी. कोणताही त्रास असेल तर तज्ज्ञांमार्फत वेळेवर उपचार घ्यावेत.

पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका

कानामध्ये सतत ओल राहत असेल तर बुरशीजन्य आजार होऊ शकतो. कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना हा त्रास होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कानामध्ये ओलावा राहू नये, याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. कान ओले असतील तर ते वेळीच साफ करावेत.

मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तीलाही कानामागील बुरशी, बॅक्टेरियाचा त्रास होवू शकतो. मधुमेहाची बाधा असलेल्या नागरिकांनीही कानाला खाज येणे, जखम होणे, दात दुखणे आदी विविध प्रकारचे त्रास होत असतील तर वेळेतच तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावून औषधोपचार घेणे गरजेचे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यात कोरोनानंतर कोणाच्या कानाला कोणताही त्रास होत असेल तर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. कान साफ करण्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. कानाला बुरशीजन्य आजार जडू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी आणि वेळेवर उपचार घेणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक

कान सतत ओला राहिला तर कानाला खाज येणे, सतत खाजविल्यामुळे जखम होण्यासह बुरशीजन्य आजार होण्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी कानाला कोणताही त्रास होत असेल तर तज्ज्ञांमार्फत उपचार घेणे गरजेचे आहे. शिवाय कान साफ करत असाल तर त्यावेळीही तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच कान साफ करणे गरजेचे आहे.

- डॉ. बी. बी. चव्हाण, कान-नाक-घसा तज्ज्ञ