शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

कोरोनातील संकट, कानांना बुरशी, बॅक्टेरियाचाही धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST

कोरोनामुळे सर्वसामान्याची झोप उडाली आहे. त्यात आता अनेकांच्या कानाला बुरशी, बॅक्टेरियाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अस्वच्छ ...

कोरोनामुळे सर्वसामान्याची झोप उडाली आहे. त्यात आता अनेकांच्या कानाला बुरशी, बॅक्टेरियाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अस्वच्छ पाण्यात पोहणे, कानात पाणी राहिल्याने ओल राहणे, सतत हेडफोनचा वापर केल्याने कानात ओलावा निर्माण होऊ नंतर कान दुखण्यासह इतर त्रास होऊ लागताे. त्यामुळे कानाला खाज येण्यासह कमी ऐकू येण्याचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांनीही कानाला होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करणे अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कानाचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर पुढील शारीरिक त्रास टाळण्यासाठी वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

काय घ्याल काळजी?

कान नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवावेत. विशेषत: अंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान तातडीने कोरडे करावेत. हेडफोन वापरत असाल तर तो वारंवार निर्जंतुक करावा. कानातील मळ काढताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच प्रक्रिया करावी.

मधुमेहाचा त्रास असलेल्या आणि कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी कानात ओलावा राहू नये, याची अधिक काळजी घ्यावी. कोणताही त्रास असेल तर तज्ज्ञांमार्फत वेळेवर उपचार घ्यावेत.

पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका

कानामध्ये सतत ओल राहत असेल तर बुरशीजन्य आजार होऊ शकतो. कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना हा त्रास होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कानामध्ये ओलावा राहू नये, याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. कान ओले असतील तर ते वेळीच साफ करावेत.

मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तीलाही कानामागील बुरशी, बॅक्टेरियाचा त्रास होवू शकतो. मधुमेहाची बाधा असलेल्या नागरिकांनीही कानाला खाज येणे, जखम होणे, दात दुखणे आदी विविध प्रकारचे त्रास होत असतील तर वेळेतच तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावून औषधोपचार घेणे गरजेचे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यात कोरोनानंतर कोणाच्या कानाला कोणताही त्रास होत असेल तर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. कान साफ करण्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. कानाला बुरशीजन्य आजार जडू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी आणि वेळेवर उपचार घेणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक

कान सतत ओला राहिला तर कानाला खाज येणे, सतत खाजविल्यामुळे जखम होण्यासह बुरशीजन्य आजार होण्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी कानाला कोणताही त्रास होत असेल तर तज्ज्ञांमार्फत उपचार घेणे गरजेचे आहे. शिवाय कान साफ करत असाल तर त्यावेळीही तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच कान साफ करणे गरजेचे आहे.

- डॉ. बी. बी. चव्हाण, कान-नाक-घसा तज्ज्ञ