शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जुई धरणाच्या चारीला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:09 IST

भोकरदन : तालुक्यातील दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्पातून शेतक-यांना रबीच्या पिकासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आलेल्या पाण्याचा कालवाच फुटल्याने लाखो ...

भोकरदन : तालुक्यातील दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्पातून शेतक-यांना रबीच्या पिकासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आलेल्या पाण्याचा कालवाच फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले.जुई धरणातून भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातील जादा पाणी कालव्यात सोडण्यात आले होते त्यावेळी बहुतांश ठिकाणी कालव्याच्या चा-या नादुरुस्त असल्यामुळे शेतक-यांच्या शेतात पाणी शिरले होते. त्यानंतर कालव्यातील पाणी बंद करण्यात आले. मात्र त्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालवा व चा-याची दुरूस्ती करणे आवश्यक होते. पण पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर शेतक-यांनी लोकसहभागातून काही ठिकाणी कालवा व चा-याची दुरूस्ती केली. त्यानंतर शेतक-यांना पाटबंधारे विभागाने रबीच्या हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी सोडले. मात्र १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान चारी क्रमांक तीन पर्यंत पाण्याचा प्रवाह गेला. तेव्हा चारीला मोठे भगदाड पडले व पूर्ण पाणी शेतातून व लगतच्या नाल्यातून सरळ जुई नदीच्या पात्रात आले. या पाण्याचा प्रवाह ११ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत सुरु असल्यामुळे जुई नदीच्या पात्रात पाणी वाढले. त्यामुळे नेमके नदीच्या पात्रात पाणी कशामुळे वाढले, याचीच चर्चा सुरू होती. तर एकीकडे रबीच्या गहू, हरभरा, मका या पिकांना पाणी मिळण्यापूर्वीच कालव्यातील पाणी हे नदीपात्रातून वाहून गेले आहे़पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियंता आऱएऩदरबस्तरवार यांनी सांगितले की, धरणापासून दोन कि़मी. अंतरावर चारीला भगदाड पडल्यामुळे कालव्यातील पाणी वाहून नाल्यात गेले आहे. धरणातील सुमारे ़०१ द़ल़घमी पाणी नदीपात्रातून वाहून गेले असून सकाळी आपण, कनिष्ठ अभियंता पी़सी़ म्हसने व कर्मचा-यांनी धरणाचा मुख्य दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र रॉड तुटला. त्यानंतर जेसीबीद्वारे गेटच्या आतील बाजूने माती टाकून कालव्यात जाणारे पाणी बंद करण्यात आले. दुपारी १ वाजेपासून गेट बंद करण्यात आले आहे, असे दरबस्तरवार यांनी सांगितले़