शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

जुई धरणाच्या चारीला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:09 IST

भोकरदन : तालुक्यातील दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्पातून शेतक-यांना रबीच्या पिकासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आलेल्या पाण्याचा कालवाच फुटल्याने लाखो ...

भोकरदन : तालुक्यातील दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्पातून शेतक-यांना रबीच्या पिकासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आलेल्या पाण्याचा कालवाच फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले.जुई धरणातून भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातील जादा पाणी कालव्यात सोडण्यात आले होते त्यावेळी बहुतांश ठिकाणी कालव्याच्या चा-या नादुरुस्त असल्यामुळे शेतक-यांच्या शेतात पाणी शिरले होते. त्यानंतर कालव्यातील पाणी बंद करण्यात आले. मात्र त्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालवा व चा-याची दुरूस्ती करणे आवश्यक होते. पण पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर शेतक-यांनी लोकसहभागातून काही ठिकाणी कालवा व चा-याची दुरूस्ती केली. त्यानंतर शेतक-यांना पाटबंधारे विभागाने रबीच्या हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी सोडले. मात्र १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान चारी क्रमांक तीन पर्यंत पाण्याचा प्रवाह गेला. तेव्हा चारीला मोठे भगदाड पडले व पूर्ण पाणी शेतातून व लगतच्या नाल्यातून सरळ जुई नदीच्या पात्रात आले. या पाण्याचा प्रवाह ११ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत सुरु असल्यामुळे जुई नदीच्या पात्रात पाणी वाढले. त्यामुळे नेमके नदीच्या पात्रात पाणी कशामुळे वाढले, याचीच चर्चा सुरू होती. तर एकीकडे रबीच्या गहू, हरभरा, मका या पिकांना पाणी मिळण्यापूर्वीच कालव्यातील पाणी हे नदीपात्रातून वाहून गेले आहे़पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियंता आऱएऩदरबस्तरवार यांनी सांगितले की, धरणापासून दोन कि़मी. अंतरावर चारीला भगदाड पडल्यामुळे कालव्यातील पाणी वाहून नाल्यात गेले आहे. धरणातील सुमारे ़०१ द़ल़घमी पाणी नदीपात्रातून वाहून गेले असून सकाळी आपण, कनिष्ठ अभियंता पी़सी़ म्हसने व कर्मचा-यांनी धरणाचा मुख्य दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र रॉड तुटला. त्यानंतर जेसीबीद्वारे गेटच्या आतील बाजूने माती टाकून कालव्यात जाणारे पाणी बंद करण्यात आले. दुपारी १ वाजेपासून गेट बंद करण्यात आले आहे, असे दरबस्तरवार यांनी सांगितले़