शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

जुई धरणाच्या चारीला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:09 IST

भोकरदन : तालुक्यातील दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्पातून शेतक-यांना रबीच्या पिकासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आलेल्या पाण्याचा कालवाच फुटल्याने लाखो ...

भोकरदन : तालुक्यातील दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्पातून शेतक-यांना रबीच्या पिकासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आलेल्या पाण्याचा कालवाच फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले.जुई धरणातून भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातील जादा पाणी कालव्यात सोडण्यात आले होते त्यावेळी बहुतांश ठिकाणी कालव्याच्या चा-या नादुरुस्त असल्यामुळे शेतक-यांच्या शेतात पाणी शिरले होते. त्यानंतर कालव्यातील पाणी बंद करण्यात आले. मात्र त्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालवा व चा-याची दुरूस्ती करणे आवश्यक होते. पण पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर शेतक-यांनी लोकसहभागातून काही ठिकाणी कालवा व चा-याची दुरूस्ती केली. त्यानंतर शेतक-यांना पाटबंधारे विभागाने रबीच्या हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी सोडले. मात्र १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान चारी क्रमांक तीन पर्यंत पाण्याचा प्रवाह गेला. तेव्हा चारीला मोठे भगदाड पडले व पूर्ण पाणी शेतातून व लगतच्या नाल्यातून सरळ जुई नदीच्या पात्रात आले. या पाण्याचा प्रवाह ११ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत सुरु असल्यामुळे जुई नदीच्या पात्रात पाणी वाढले. त्यामुळे नेमके नदीच्या पात्रात पाणी कशामुळे वाढले, याचीच चर्चा सुरू होती. तर एकीकडे रबीच्या गहू, हरभरा, मका या पिकांना पाणी मिळण्यापूर्वीच कालव्यातील पाणी हे नदीपात्रातून वाहून गेले आहे़पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियंता आऱएऩदरबस्तरवार यांनी सांगितले की, धरणापासून दोन कि़मी. अंतरावर चारीला भगदाड पडल्यामुळे कालव्यातील पाणी वाहून नाल्यात गेले आहे. धरणातील सुमारे ़०१ द़ल़घमी पाणी नदीपात्रातून वाहून गेले असून सकाळी आपण, कनिष्ठ अभियंता पी़सी़ म्हसने व कर्मचा-यांनी धरणाचा मुख्य दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र रॉड तुटला. त्यानंतर जेसीबीद्वारे गेटच्या आतील बाजूने माती टाकून कालव्यात जाणारे पाणी बंद करण्यात आले. दुपारी १ वाजेपासून गेट बंद करण्यात आले आहे, असे दरबस्तरवार यांनी सांगितले़