शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

न्यायालयाने संवेदनशीलपणे काम करावे - न्यायमूर्ती नलवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:20 IST

अंबड : न्यायालयाने शासनाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे, अनेक शासकीय योजना उपयुक्त आणि चांगल्या आहेत. त्या लोकांपर्यंत ...

अंबड : न्यायालयाने शासनाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे, अनेक शासकीय योजना उपयुक्त आणि चांगल्या आहेत. त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी संवेदनशीलपणे न्यायालयाने काम करण्याची गरज आहे. न्यायाधीशांनी सामान्य लोकांचा विचार समोर ठेवून न्यायदानाचे काम करावे. गरीब लोकांसाठी न्यायालयाने काम करावे, असेही प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ता.वी. नलवडे यांनी केले.

अंबड येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे रविवारी ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे, न्यायमूर्ती ता.वी. नलवडे, जालना जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले, न्यायाधीश भगुरे यांची उपस्थिती होती. न्यायमूर्ती नलवडे यांच्या हस्ते न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन झाले.

पुढे बोलताना न्यायमूर्ती नलवडे म्हणाले की, आपल्या गावाजवळ न्यायालय आल्यामुळे पक्षकारांना सोयीचे झाले आहे. या न्यायालयातून न्यायाधीशांनी न्यायनिवाडे शीघ्र गतीने करावेत. प्रत्येक तालुक्यात न्यायालय स्थापन झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय दूर झाली आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी केले. त्या म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांपासून पालकमंत्री राजेश टोपे हे अंबड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्यासाठी न्याय प्राधिकरणाकडे पाठपुरावा करीत होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असल्याचे त्या म्हणाल्या. या वेळी अ‍ॅड. मंत्री, अ‍ॅड. संभाजी टोपे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार अंबड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. घायतडक यांनी मानले.

विधिज्ञांनी सर्वसामान्य पक्षकारांना न्याय देण्याचे काम करावे - टोपे

न्यायालयात भौतिक सोयी-सुविधा व गरजा पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. न्याय आपल्या दारी या भूमिकेने सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत सर्वसामान्य पक्षकारांना न्याय देण्याचे काम विधिज्ञांनी करावे. भौगोलिक दृष्टीने अंबड, घनसावंगी तालुके मोठे आहेत. तालुक्यातील लोकांना न्यायालयीन कामासाठी जालना शहरात जावे लागत होते. म्हणून आपण पाठपुरावा करून येथे अतिरिक्त सत्र न्यायालय उभारले आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.