शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

coronavirus : कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी पाच जिल्ह्यांत सुरू होणार टेली आयसीयू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 14:26 IST

याद्वारे दिल्ली व इतर ठिकाणी असलेले विशेष तज्ज्ञ डॉक्टरांकडून आयसीयूतील कोरोना रूग्णांची दिवसातून तीन वेळेस पाहणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देया सेवेत रुग्णालयातील आयसीयूमध्ये कॅमेरा ठेवला जाणार आहे.ही सेवा मेडस्केप एनजीओ आणि वूई डॉक्टरर्स नावाचा कॅम्पेनच्या माध्यमातून सुरू होत आहे.

जालना : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे टेली आयसीयू ही सेवा यशस्वीरीत्या राबविण्यात आली. त्याच धर्तीवर गुरुवारपासून राज्यातील जालना, औरंगाबाद, जळगाव, अकोला आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत गुरुवारपासून ही सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जालना येथे दिली. 

यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे. या सेवेत रुग्णालयातील आयसीयूमध्ये कॅमेरा ठेवला जाणार आहे. याद्वारे दिल्ली व इतर ठिकाणी असलेले विशेष तज्ज्ञ डॉक्टरांकडून आयसीयूतील कोरोना रूग्णांची दिवसातून तीन वेळेस पाहणी केली जाणार आहे. रूग्णांची तपासणी, औषधोपचार आदींची माहिती घेऊन हे तज्ज्ञ औषधोपचाराबाबत मार्गदर्शन करणार आहेत.  

ही सेवा मेडस्केप एनजीओ आणि वूई डॉक्टरर्स नावाचा कॅम्पेनच्या माध्यमातून सुरू होत आहे. या सेवेबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ही सेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे. ही सेवा सर्वत्र सुरू झाली तर तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग होणार असून, त्यातून राज्यातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर कमी होईल, असा विश्वासही टोपे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस