शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कोरोनाचा फटका; प्रवासी नसल्याने बस स्थानक पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:32 IST

जाफराबाद : संचारबंदीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत. मात्र, बस स्थानकात प्रवासीच येत नसल्याने ...

जाफराबाद : संचारबंदीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत. मात्र, बस स्थानकात प्रवासीच येत नसल्याने बस स्थानक ओस पडले आहे. गेल्या पाच दिवसांपासून एकही बस जाफराबादच्या बस स्थानकातून सुटली नाही. इतर वेळी केवळ जाफराबाद आगाराच्या ७० फेऱ्या होतात. मात्र, आता एकही बस सुटत नसल्याने बस स्थानक ओस पडले आहे.

जाफराबाद बस स्थानकातून मोठ्या प्रमाणात लांब पल्ल्याच्या गाड्या जातात. दिवसभरात किमान ५० पेक्षा जास्त बस जाफराबादच्या बस स्थानकात येतात. तर जाफराबाद बस स्थानकातून जाफराबाद आगाराच्या ७० फेऱ्या येणे व जाणे दररोज होत होत्या. मात्र, जालना जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यातच जाफराबाद तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. शासनाने कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. संचारबंदीच्या काळात बससेवेला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही परवानगी अत्यावश्यक सेवेसाठीच लागू आहे. इतर प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, असा नियम शासनाच्या वतीने लागू करण्यात आला आहे. परिणामी, प्रवासी बस स्थानकाकडे फिरकलेच नाहीत. अत्यावश्यक सेवेसाठी असे कर्मचारी स्वत:च्या वाहनाने प्रवास करून लागल्याने गेल्या काही दिवसांपासून जाफराबाद बस स्थानकातील बहुतांश बस बंद आहेत. परिणामी, जाफराबाद बस स्थानक ओस पडले आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊन लावण्यात आल्यापासून वर्षभरात जाफराबाद आगाराच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने एसटी महामंडळाची आर्थिक घडी बसत होती. मात्र, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला व महामंडळाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे.

एन. चव्हाण, आगारप्रमुख