शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कोरोनाचा फटका; प्रवासी नसल्याने बस स्थानक पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:32 IST

जाफराबाद : संचारबंदीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत. मात्र, बस स्थानकात प्रवासीच येत नसल्याने ...

जाफराबाद : संचारबंदीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत. मात्र, बस स्थानकात प्रवासीच येत नसल्याने बस स्थानक ओस पडले आहे. गेल्या पाच दिवसांपासून एकही बस जाफराबादच्या बस स्थानकातून सुटली नाही. इतर वेळी केवळ जाफराबाद आगाराच्या ७० फेऱ्या होतात. मात्र, आता एकही बस सुटत नसल्याने बस स्थानक ओस पडले आहे.

जाफराबाद बस स्थानकातून मोठ्या प्रमाणात लांब पल्ल्याच्या गाड्या जातात. दिवसभरात किमान ५० पेक्षा जास्त बस जाफराबादच्या बस स्थानकात येतात. तर जाफराबाद बस स्थानकातून जाफराबाद आगाराच्या ७० फेऱ्या येणे व जाणे दररोज होत होत्या. मात्र, जालना जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यातच जाफराबाद तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. शासनाने कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. संचारबंदीच्या काळात बससेवेला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही परवानगी अत्यावश्यक सेवेसाठीच लागू आहे. इतर प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, असा नियम शासनाच्या वतीने लागू करण्यात आला आहे. परिणामी, प्रवासी बस स्थानकाकडे फिरकलेच नाहीत. अत्यावश्यक सेवेसाठी असे कर्मचारी स्वत:च्या वाहनाने प्रवास करून लागल्याने गेल्या काही दिवसांपासून जाफराबाद बस स्थानकातील बहुतांश बस बंद आहेत. परिणामी, जाफराबाद बस स्थानक ओस पडले आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊन लावण्यात आल्यापासून वर्षभरात जाफराबाद आगाराच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने एसटी महामंडळाची आर्थिक घडी बसत होती. मात्र, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला व महामंडळाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे.

एन. चव्हाण, आगारप्रमुख