शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

‘कोळी’चे नियंत्रण केल्यास फळे खराब होण्याचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:27 IST

जालना : मोसंबीवरील कोळी किडीचे वेळीच नियंत्रण केल्यास फळे खराब होण्याचे प्रमाण कमी होते. शिवाय चांगली प्रतीचे फळे मिळून ...

जालना : मोसंबीवरील कोळी किडीचे वेळीच नियंत्रण केल्यास फळे खराब होण्याचे प्रमाण कमी होते. शिवाय चांगली प्रतीचे फळे मिळून बाजारभाव चांगला मिळतो. यासाठी मोसंबीचा बहर धरल्यानंतर फळ धारणा सुरू झाल्यास झाडावर १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या डायकोफॉल (१८.५ इसीत्न. २ मिली किंवा व पाण्यात मिसळणारे गंधक ३ ग्राम प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी यांनी केले आहे.

मोसंबी हे जालना जिल्ह्यातील महत्त्वाचे फळ पीक आहे. सध्या मोसंबी पिकांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यात मोसंबी फळाची प्रत खराब असून खराब झालेल्या फळास बाजारामध्ये योग्य तो भाव मिळत नाही. या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी व मृदशास्त्रज्ञ प्रा. राहुल चौधरी यांनी अंबड तालुक्यातील घुंगरडे हदगाव येथील शेतकरी चोरमले यांच्या मोसंबी बागेस नुकतीच भेट देऊन शेतक-यांना मार्गदर्शन केले.

आंबे बहारासाठी मोसंबीस ताण तोडल्यास झाडास शेणखत व शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा योग्य प्रमाणात द्यावी, असे प्रा. चौधरी यांनी सांगितले.

चौकट

सध्या मोसंबीची बाग फळावर असून, मोसंबीवर कोळी किडींच्या प्रादुर्भावामुळे फळे काळे पडून खराब होत आहेत. कोळी ही अष्टपदी कीटक आहे. ही कीड सूक्ष्म असल्यामुळे डोळ्याला सहजासहजी दिसून येत नाही. या किडीचा प्रादुर्भाव पानावर, फळांवर आढळून येतो. ही कीड पानातील व फळातील रस शोषण करते. त्यामुळे प्रारंभी पानावर व फळांवर ठिपके दिसून येतात. नंतर पूर्ण फळे चंदेरी काळपट रंगाचे दिसण्यास प्रारंभ होतो, असेही मिटकरी म्हणाले.