शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

वाळू घाटांच्या दरावरून कंत्राटदार - प्रशासनात न्यायिक वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

राज्य सरकारने वाळू घाटांचे लिलाव करताना राज्यपातळीवर पर्यावरण समितीची नियुक्ती केली होती. या समितीकडे सर्व वाळू घाटांचे प्रस्ताव पाठवून ...

राज्य सरकारने वाळू घाटांचे लिलाव करताना राज्यपातळीवर पर्यावरण समितीची नियुक्ती केली होती. या समितीकडे सर्व वाळू घाटांचे प्रस्ताव पाठवून त्यांना मंजुरी घेण्यातच वर्ष लोटले. त्यातच कोरोनाचाही मोठा फटका या लिलावाला बसला आहे. दरम्यान, वाळू घाटांचे लिलाव नसल्याने वाळूचा प्रचंड तुटवडा निर्माण होऊन दर वाढले आहेत. हे दर वाढल्याने बांधकामावर विपरीत परिणाम झाला आहे.

ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी वाळू घाटांच्या लिलावास परवानगी दिली. त्यानुसार जालना जिल्ह्याचा विचार केल्यास २२ वाळू घाटांचे लिलाव करण्यास परवानगी दिली. तसेच ऑनलाईन पद्धतीने हे लिलाव झाले; परंतु हे लिलाव झाल्यावर मंठा येथील कैलास बोराडे यांनी या लिलावात ज्या वाळू घाटांच्या किमती वेगवेगळ्या जिल्ह्यात ठरविल्या आहेत, त्या मान्य नसल्याचा मुद्दा उपस्थित करून याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला, न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी सुनावणी घेऊन बोराडे यांना दिलासा दिला नाही. दरम्यान, यात बोराडे यांचे वकील पालोदकर यांनी सांगितले की, २०१९ मध्ये जो जीआर काढला होता, त्यात परभणी, जालना, हिंगोली, बुलडाणा येथून वाहणाऱ्या नद्या एकच असून, त्यातील वाळूदेखील सारखीच आहे. त्यामुळे हे वेगवेगळे दर कशामुळे, असा मुद्दा उपस्थित केला. तसेच दर ठरविताना जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून ते ठरविणे आवश्यक होते. तसे झाले नसल्याचे पालोदकर यांनी सांगितले. परंतु प्रत्येक नदीतून होणारा वाळूचा उपसा हा वेगवेगळा असल्याने तसेच दर ठरललले नसल्याचे सरकार पक्षाचे वकील ॲड. काळे यांनी सांगितले. या प्रकरणात दोन्ही बाजू ऐकल्यावर याचिका दाखल करणाऱ्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे आता कैलास बोराडे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात असल्याचे बोराडे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.