शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

वाळू घाटांच्या दरावरून कंत्राटदार - प्रशासनात न्यायिक वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

राज्य सरकारने वाळू घाटांचे लिलाव करताना राज्यपातळीवर पर्यावरण समितीची नियुक्ती केली होती. या समितीकडे सर्व वाळू घाटांचे प्रस्ताव पाठवून ...

राज्य सरकारने वाळू घाटांचे लिलाव करताना राज्यपातळीवर पर्यावरण समितीची नियुक्ती केली होती. या समितीकडे सर्व वाळू घाटांचे प्रस्ताव पाठवून त्यांना मंजुरी घेण्यातच वर्ष लोटले. त्यातच कोरोनाचाही मोठा फटका या लिलावाला बसला आहे. दरम्यान, वाळू घाटांचे लिलाव नसल्याने वाळूचा प्रचंड तुटवडा निर्माण होऊन दर वाढले आहेत. हे दर वाढल्याने बांधकामावर विपरीत परिणाम झाला आहे.

ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी वाळू घाटांच्या लिलावास परवानगी दिली. त्यानुसार जालना जिल्ह्याचा विचार केल्यास २२ वाळू घाटांचे लिलाव करण्यास परवानगी दिली. तसेच ऑनलाईन पद्धतीने हे लिलाव झाले; परंतु हे लिलाव झाल्यावर मंठा येथील कैलास बोराडे यांनी या लिलावात ज्या वाळू घाटांच्या किमती वेगवेगळ्या जिल्ह्यात ठरविल्या आहेत, त्या मान्य नसल्याचा मुद्दा उपस्थित करून याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला, न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी सुनावणी घेऊन बोराडे यांना दिलासा दिला नाही. दरम्यान, यात बोराडे यांचे वकील पालोदकर यांनी सांगितले की, २०१९ मध्ये जो जीआर काढला होता, त्यात परभणी, जालना, हिंगोली, बुलडाणा येथून वाहणाऱ्या नद्या एकच असून, त्यातील वाळूदेखील सारखीच आहे. त्यामुळे हे वेगवेगळे दर कशामुळे, असा मुद्दा उपस्थित केला. तसेच दर ठरविताना जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून ते ठरविणे आवश्यक होते. तसे झाले नसल्याचे पालोदकर यांनी सांगितले. परंतु प्रत्येक नदीतून होणारा वाळूचा उपसा हा वेगवेगळा असल्याने तसेच दर ठरललले नसल्याचे सरकार पक्षाचे वकील ॲड. काळे यांनी सांगितले. या प्रकरणात दोन्ही बाजू ऐकल्यावर याचिका दाखल करणाऱ्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे आता कैलास बोराडे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात असल्याचे बोराडे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.