शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘खिडकी’ गाठण्यासाठी ग्राहकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST

परतूर : शहरातील एसबीआय बँकेत सुरू करण्यात आलेल्या ‘खिडकी’जवळ जाण्यासाठी ग्राहकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषत: महिला व ...

परतूर : शहरातील एसबीआय बँकेत सुरू करण्यात आलेल्या ‘खिडकी’जवळ जाण्यासाठी ग्राहकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषत: महिला व वयोवृद्धांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियात दिवसेंदिवस गोंधळ वाढत आहे. या बँकेचा अर्ध्याहून अधिक कारभार हा बाहेरच चालत आहे. यातच ग्राहकांची वाढलेली संख्या व अपुरे कर्मचारी यामुळे या ग्राहक बँकेच्या कारभाराला वैतागले आहेत. बँकेचे कामकाज बाहेरील चारपाच खिडक्यांतून चालते. या खिडक्यांच्या तोंडावर लाकडी दांड्या बांधण्याची शक्कल या बँक व्यवस्थापनाने लढवली आहे. याचे कारण ग्राहक व संबंधित कर्मचारी अधिक जवळ येऊ नये, असे आहे. परंतु, या बांधलेल्या लाकडाखालून खिडकीजवळ गेल्याशिवाय कामच होत नाही. प्रत्येक ग्राहकास या लाकडाखालून वाकून खिडकी गाठावी लागत आहे. यामध्ये वृद्ध व महिला ग्राहकांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

कर्मचा-यांची अरेरावी

या बँकेत ग्राहकांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ग्राहक काही विचारणा करण्यास गेले असता त्यांना कर्मचारी अरेरावी करीत आहेत. तसेच थकीत पीक कर्जासाठी एक योजना रबवण्यात येत आहे. यातही मोठा गोंधळ सुरू असून, शेतक-यांना वेगवेगळे नियम दाखवून त्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवली जात आहेत. याकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

कॅप्शन : परतूर येथील एसबीआय बँकेतील खिडकीजवळ जाण्यासाठी ग्राहकांना अशी कसरत करावी लागते.