शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

अंबड नगरपालिकेत भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेसचा उपनगराध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

अंबड : देशपातळीवर काँग्रेस व भाजप यांच्यातून विस्तव जात नाही. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या संसदेत जोरदार रणकंदन ...

अंबड : देशपातळीवर काँग्रेस व भाजप यांच्यातून विस्तव जात नाही. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या संसदेत जोरदार रणकंदन सुरू आहे. असे असतानाही सोमवारी अंबड नगरपालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेसचा उमेदवार उपनगराध्यक्षपदी विराजमान झाला.

अंबड पालिकेतील काँग्रेसचे नेते केदार बाबूराव कुलकर्णी यांनी ६ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. नवीन उपनगराध्यक्ष निवडीसाठी सोमवारी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल व सहायक अधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे ही निवडणूक महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे शेख जाकेर शेख मकबूल व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आसमाँ परवीन अफरोज पठाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यात शेख जाकेर शेख मकबूल यांना १२, तर आसमाँ परवीन अफरोज पठाण यांना ५ मते मिळाली. अंबड नगरपालिकेत सध्या एकूण १९ नगरसेवक असून, त्यामध्ये भाजपचे ६, काँग्रेसचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, राष्ट्रीय समाज पक्षाचे २ व शिवसेनेचा १ असे पक्षीय बलाबल आहे. यापैकी दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याचा आक्षेप शासनदरबारी दाखल असल्यामुळे भाजपच्या दोन नगरसेवकांना मतदान करण्यास मनाई करण्यात आली होती, तर शिवसेनेच्या संजीवनी हनुमान धांडे या मतदानास गैरहजर राहिल्या. १६ नगरसेवक व १ नगराध्यक्ष असे एकूण १७ जणांनी मतदान केले. काँग्रेसच्या शेख जाकेर शेख मकबूल यांना काँग्रेसचे ५, भाजपचे ४, राष्ट्रीय समाज पक्षाचे २ व भाजपच्या नगराध्यक्षा संगीता देविदास कुचे यांचे १ अशी एकूण १२ मते मिळाली, तर आसमाँ परवीन अफरोज पठाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ सदस्यांची मते मिळाली.

निवडणुकीनंतर वातावरण तापले

निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शिवप्रसाद चांगले यांनी काँग्रेसवर टीका करताना राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेसने आघाडी धर्माचे पालन करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांची साथ सोडून भाजपशी अभद्र आघाडी केल्याचा आरोप केला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.