शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अंबड नगरपालिकेत भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेसचा उपनगराध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

अंबड : देशपातळीवर काँग्रेस व भाजप यांच्यातून विस्तव जात नाही. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या संसदेत जोरदार रणकंदन ...

अंबड : देशपातळीवर काँग्रेस व भाजप यांच्यातून विस्तव जात नाही. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या संसदेत जोरदार रणकंदन सुरू आहे. असे असतानाही सोमवारी अंबड नगरपालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेसचा उमेदवार उपनगराध्यक्षपदी विराजमान झाला.

अंबड पालिकेतील काँग्रेसचे नेते केदार बाबूराव कुलकर्णी यांनी ६ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. नवीन उपनगराध्यक्ष निवडीसाठी सोमवारी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल व सहायक अधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे ही निवडणूक महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे शेख जाकेर शेख मकबूल व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आसमाँ परवीन अफरोज पठाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यात शेख जाकेर शेख मकबूल यांना १२, तर आसमाँ परवीन अफरोज पठाण यांना ५ मते मिळाली. अंबड नगरपालिकेत सध्या एकूण १९ नगरसेवक असून, त्यामध्ये भाजपचे ६, काँग्रेसचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, राष्ट्रीय समाज पक्षाचे २ व शिवसेनेचा १ असे पक्षीय बलाबल आहे. यापैकी दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याचा आक्षेप शासनदरबारी दाखल असल्यामुळे भाजपच्या दोन नगरसेवकांना मतदान करण्यास मनाई करण्यात आली होती, तर शिवसेनेच्या संजीवनी हनुमान धांडे या मतदानास गैरहजर राहिल्या. १६ नगरसेवक व १ नगराध्यक्ष असे एकूण १७ जणांनी मतदान केले. काँग्रेसच्या शेख जाकेर शेख मकबूल यांना काँग्रेसचे ५, भाजपचे ४, राष्ट्रीय समाज पक्षाचे २ व भाजपच्या नगराध्यक्षा संगीता देविदास कुचे यांचे १ अशी एकूण १२ मते मिळाली, तर आसमाँ परवीन अफरोज पठाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ सदस्यांची मते मिळाली.

निवडणुकीनंतर वातावरण तापले

निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शिवप्रसाद चांगले यांनी काँग्रेसवर टीका करताना राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेसने आघाडी धर्माचे पालन करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांची साथ सोडून भाजपशी अभद्र आघाडी केल्याचा आरोप केला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.