शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या बदलीमध्ये सर्वसमावेशक निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

जालना : राज्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली व जिल्हांतर्गत बदलीचा धोरणात्मक निर्णय हा सर्वसमावेशक असावा, अशी मागणी प्रहार शिक्षक व ...

जालना : राज्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली व जिल्हांतर्गत बदलीचा धोरणात्मक निर्णय हा सर्वसमावेशक असावा, अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख संतोष राजगुरू यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये संवर्ग एक व संवर्ग दोन यांच्या बदल्या झाल्यानंतर रिक्त जागा घोषित कराव्यात. ज्यामुळे उर्वरित बदली धारकांना रिक्त जागी बदली मागणे सोपे होईल. अशाच प्रकारे प्रत्येक फेरीनंतर रिक्त पदे अपडेट करून ती प्रसिद्ध करावीत. पती-पत्नी (सहशिक्षक-पदवीधर) ३० किलोमीटरच्या परिघात रिक्तपद नसल्यास ३० किलोमीटरच्या बाहेर बदली होऊ नये. संवर्ग चार करिता किमान-कमाल बदलीची टक्केवारी असावी. मुख्याध्यापकांना स्थानिक परिस्थितीवरील बदलाचे अधिकार द्यावेत, अवघड क्षेत्र पुर्नरचना व्हावी. बोगस संवर्ग एक व संवर्ग दोन यांनी बदली करून घेतल्यास कडक शिक्षेची तरतूद असावी. उपक्रमशील शिक्षकांना इच्छेनुसार बदलीतून सूट द्यावी, मुख्यालयाजवळ बदलीची संधी मिळावी. रँडमरायझेशन आणि विस्थापित शिक्षकांना संभाव्य बदल्यांमध्ये प्राधान्यक्रम देण्यात यावा. आंतर जिल्हा बदलीने उपस्थित झालेल्या शिक्षकांची मुळसेवा जिल्हांतर्गत बदलीसाठी ग्राह्य धरावी. आंतरजिल्हा बदली टप्पा पाच हा पोकळ बिंदूनुसार राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा. अतिरिक्त बिंदू व रिक्तपदाच्या १० टक्क्यांचा विचार न करता बदली प्रक्रिया राबवावी, यासह इतर विविध मागण्या राजगुरू यांनी निवेदनात केल्या आहेत.

कोट

यावर्षी शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली निर्णय हा सर्वसमावेशक असावा, अशी मागणी सर्व शिक्षकांची आहे. या मागणीचा विचार करू, असे आश्वासन ग्रामविकास विभाग मंत्री हसन मुश्रीफ यांनी संघटनेला दिले आहे.

संतोष राजगुरू

प्रहार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना

फोटो