शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सोशल मीडियातून भरले जाताहेत जिल्ह्याच्या राजकारणाचे रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:36 IST

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून, सोशल मीडियातून राजकीय रंग भरण्यास सुरुवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून, सोशल मीडियातून राजकीय रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियातील अ‍ॅप्सच्या माध्यमातून राजकीय नेत्यांची वातावरण निर्मिती केली जात आहे. यातून निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.लोकसभा आणि विधानसभेचा कालवधी संपण्यास एक कालावधी असला तरी राजकीय अस्थिरतेमुळे केव्हाही निवडणुक होऊ शकतात, हे चित्र आहे. या संभाव्य परिस्थितीमुळे सर्वच राजकीय प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून, उमेदवारांची चाचपणी आणि पक्षाच्या शक्तीचा अंदाज घेतला जात आहे. पारंपरिक माध्यमांसह सोशल मीडिया २०१४ च्या निवडणुकांपासून अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले. किंबहुना सोशल मीडियामुळे अनेक उमेदवारांचा विजय झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले गेले. म्हणूनच राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकवर नेहमी चर्चेत राहण्यासह कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांशी जोडण्याचे कसब या नेत्यांनी प्राप्त केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. मतदार संघात संभाव्य उमेदवार आणि नेत्यांचे दौरे आणि मतदारांशी सुरु झालेला संवाद यामुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. फेसबुकच्या माध्यमातून एका अ‍ॅप्सद्वारे जिल्ह्यातील नेत्यांना प्रोजेक्ट केले जात आहे.फेसबुक असणाऱ्यांना विविध प्रश्नांद्वारे नेत्यांच्या लोकप्रियतेची चाचपणी आणि मतदारांचा कल आतापासूनच घेतला जात आहे. जिल्ह्यातील कोणता राजकीय नेता तुम्हाला राजकारणात वाव देऊ शकतो, तुमचे विचार कोणत्या पक्षाशी मिळतेजुळते आहेत, अशा प्रश्नांद्वारे राजकीय वातावरण तापविले जात आहे.नेत्यांचे होतेय प्रोजेक्शन..विधानसभा मतदार संघनिहाय सोशल मीडियातील विविध अ‍ॅप्सद्वारे मतदारांना आकर्षित करुन चर्चा घडवून आणली जात आहे. यातूनच काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचे प्रोजेक्शन केले जात असल्याचे दिसते. सोशल मीडियाचे वाढते महत्त्व पाहता राजकीय नेते या माध्यमाकडे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सक्रिय झाल्याचे दिसते. संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवारास शह देण्यासाठी या सोशल मीडियातून प्रयत्न केला जात आहे.