शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

रमाबाईनगर, अण्णा भाऊ साठेनगरातील चूल पाच दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:32 IST

जालना : अतिवृष्टीमुळे रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगरमधील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तब्बल पाच दिवसांपासून अनेकांच्या घरातील ...

जालना : अतिवृष्टीमुळे रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगरमधील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तब्बल पाच दिवसांपासून अनेकांच्या घरातील चुली पेटल्या नाहीत. त्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या या भागातील नागरिकांची शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी भेट घेऊन संवाद साधला. तसेच गरजू नागरिकांना अन्नधान्याची उपलब्धता करून दिली.

शहरासह परिसरात गत काही दिवसांपासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे. अनेकांच्या घरात गुडघ्या इतके पाणी असल्याने त्यांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगर भागाची स्थिती गंभीर होती. ही माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी शहरप्रमुख विष्णू पाचफुले, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, दीपक राननवरे, मिलिंद काळे, सुभाष पितांबरे यांच्यासह त्या भागात धाव घेतली. यावेळी अतिवृष्टीने निर्माण झालेल्या समस्यांच्या व्यथा अनेकांनी मांडल्या. या भागात प्रत्येक पावसाळ्यात अशीच स्थिती निर्माण होत असल्याचे अनेकांनी सांगितले. त्यावेळी अंबेकर यांनी संबंधितांशी चर्चा केली. तसेच आबाल-वृद्धांच्या अन्नाची सोय करून दिली. यावेळी या भागातील नागरिक उपस्थित होते.

चौकट

प्रशासनाकडे पाठपुरावा

शहरातील रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगरमधील सद्य:स्थिती बिकट आहे. अनेकांच्या घरात प्रत्येक पावसाळ्यात पाणी जात आहे. ही बाब आपण प्रशासनासमोर मांडणार आहोत. शिवाय त्यांचे प्रश्न सोडवून मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख शिवसेना

फोटो