शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

रमाबाईनगर, अण्णा भाऊ साठेनगरातील चूल पाच दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:32 IST

जालना : अतिवृष्टीमुळे रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगरमधील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तब्बल पाच दिवसांपासून अनेकांच्या घरातील ...

जालना : अतिवृष्टीमुळे रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगरमधील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तब्बल पाच दिवसांपासून अनेकांच्या घरातील चुली पेटल्या नाहीत. त्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या या भागातील नागरिकांची शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी भेट घेऊन संवाद साधला. तसेच गरजू नागरिकांना अन्नधान्याची उपलब्धता करून दिली.

शहरासह परिसरात गत काही दिवसांपासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे. अनेकांच्या घरात गुडघ्या इतके पाणी असल्याने त्यांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगर भागाची स्थिती गंभीर होती. ही माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी शहरप्रमुख विष्णू पाचफुले, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, दीपक राननवरे, मिलिंद काळे, सुभाष पितांबरे यांच्यासह त्या भागात धाव घेतली. यावेळी अतिवृष्टीने निर्माण झालेल्या समस्यांच्या व्यथा अनेकांनी मांडल्या. या भागात प्रत्येक पावसाळ्यात अशीच स्थिती निर्माण होत असल्याचे अनेकांनी सांगितले. त्यावेळी अंबेकर यांनी संबंधितांशी चर्चा केली. तसेच आबाल-वृद्धांच्या अन्नाची सोय करून दिली. यावेळी या भागातील नागरिक उपस्थित होते.

चौकट

प्रशासनाकडे पाठपुरावा

शहरातील रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगरमधील सद्य:स्थिती बिकट आहे. अनेकांच्या घरात प्रत्येक पावसाळ्यात पाणी जात आहे. ही बाब आपण प्रशासनासमोर मांडणार आहोत. शिवाय त्यांचे प्रश्न सोडवून मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख शिवसेना

फोटो