शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न; रुग्णालयांतील ओपीडी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST

सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. परंतु, लहान मुलांना ताप, खोकला, सर्दी यांसह इतर विविध आजार जडू लागले आहेत. ...

सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. परंतु, लहान मुलांना ताप, खोकला, सर्दी यांसह इतर विविध आजार जडू लागले आहेत. हे आजार कोरोनाची लक्षणे असल्याने पालकांची धास्ती वाढली आहे. अनेक नागरिक मुलांना खासगी डॉक्टरांकडे नेऊन उपचार घेत आहेत, तर शासकीय रुग्णालयातील बालरोग विभागात येणाऱ्या बाल रुग्णांची संख्याही मोठी वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. वातावरणातील बदलांमुळे लहान मुलांना तपीसह इतर आजार जडू लागले आहेत. खासगी रुग्णालयांसह जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील ओपीडीतही दुप्पटीने वाढ झाली आहे.

सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. परंतु, लहान मुलांना ताप, खोकला, सर्दी यासह इतर विविध आजार जडू लागले आहेत. हे आजार कोरोनाची लक्षणे असल्याने पालकांची धास्ती वाढली आहे. अनेक नागरिक मुलांना खासगी डॉक्टरांकडे नेऊन उपचार घेत आहेत, तर शासकीय रुग्णालयातील बालरोग विभागात येणाऱ्या बालरुग्णांची संख्याही मोठी वाढली आहे.

५० टक्के मुलांची कोरोना चाचणी

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या बालरुग्णांना अधिकची ताप आणि खोकला असेल तर त्यांची कोरोना तपासणी होते.

काळजीपोटी कोरोनाची तपासणी करण्यावर भर दिला जात आहे. हे प्रमाण सरासरी ५० टक्क्यांहून अधिक आहे.

डेंग्यू-मलेरियाची चाचणी

सध्या शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत डेंग्यूसदृश आजारासह मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. यातील बहुतांश रुग्णांची तपासणी केली जात आहे. आजारानुसार घ्यावयाचे औषधी आणि दक्षता याबाबत तज्ज्ञ डॉक्टर पालकांना मार्गदर्शन करीत आहेत. डेंग्यू-मलेरियाची चाचणी सध्या शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत डेंग्यूसदृश आजारासह मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. यातील बहुतांश रुग्णांची तपासणी केली जात आहे. आजारानुसार घ्यावयाचे औषधी आणि दक्षता याबाबत तज्ज्ञ डॉक्टर पालकांना मार्गदर्शन करीत आहेत.

बालरोग तज्ज्ञ म्हणतात....

वातावरणातील बदलांमुळे बालरुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ताप, सर्दी खोकला आदी विविध आजार मुलांना होत आहेत. मुलांचा या आजारापासून बचाव करण्यासाठी पालकांनी अधिकची काळजी घेण्याची गरज आहे.

- डॉ. संजय जगताप,

बालरोग तज्ज्ञ

गत काही दिवसांमध्ये बाल रुग्णांच्या ओपीडीत वाढ झाली आहे. तापीचे रुग्ण वाढले आहेत. वातावरणातील बदलांचा हा परिणाम आहे. पालकांनी घाबरून न जाता आणि घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.

- पीयुश होलानी, बालरोगतज्ज्ञ

ही घ्या काळजी

पावसाळ्यात पाणी शक्यतो उकळून, निर्जंतुकीकरण करून प्यावे.

पालकांनी लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी फिरण्यास नेऊ नये.

बाहेरील, उघड्यावरील आणि शिळे अन्नपदार्थ खाणे टाळावे.