शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
3
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
4
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
5
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
6
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
7
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
8
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
9
टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान
10
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
11
रशियाच्या शत्रू जमिनीवर गरजले भारताचे सुखोई ३० जेट; भारतीय पायलटनं उडवलं F15 विमान, चीन चिंतेत
12
Latur: अश्लील व्हिडीओ आणि तिसरीतील विद्यार्थ्याने वर्गमित्रासोबतच अनैसर्गिक...; लातुरमधील शाळेतील घटना
13
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
14
IPL स्टार खेळाडूवर अत्याचाराचा आरोप; तर तरुणी ब्लॅकमेल करत असल्याची क्रिकेटरची तक्रार
15
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
16
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
17
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
18
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
19
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
20
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना मिळणार जेईई, नीटचे मोफत धडे; जालना झेडपीच्या स्तुत्य उपक्रम

By विजय मुंडे  | Updated: June 2, 2023 18:32 IST

राज्यातील प्रथम उपक्रम; परीक्षेद्वारे होणार विद्यार्थ्यांची निवड

जालना : जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या शेतकरी, कष्टकऱ्यांच्या ३० मुला- मुलींना मोफत जेईई, आयआयटी, नीटचे धडे देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जाणार असून, परीक्षेद्वारे या ३० मुला- मुलींची निवड केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांची जेईई, आयआयटी, नीटच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी दोन वर्षात लाखो रुपयांचा खर्च पालकांना करावा लागतो. परंतु, ग्रामीण भागातील विशेषत: शेतकरी, कष्टकऱ्यांची मुलं-मुली हुशार असली तरी त्यांना हा खर्च परवडणारा नसतो. ही बाब ओळखून जिल्हा परिषदेच्या वतीने १५ मुले आणि १५ मुलींना दोन वर्ष कालावधीत अकरावी- बारावी शिक्षणासोबतच जेईई, आयआयटी, नीटचे मोफत धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून खर्च करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी ११ जून रोजी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १२० गुणांची परीक्षाजालना येथील जिल्हा परिषद प्रशालेत घेतली जाणार आहे.

मानधनावर होणार शिक्षकांची नियुक्तीविद्यार्थ्यांना फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे धडे देण्यासाठी मानधन तत्त्वावर चार तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. हे चार तज्ज्ञ या ३० विद्यार्थ्यांची पुढील दोन वर्षात जेईई, आयआयटी, नीटची तयारी करून घेणार आहेत.

या शाळांतील मुलं होणार पात्रजिल्ह्यातील जिल्हा प्रशाला व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून दहावीची परीक्षा दिलेले मुलं- मुली पात्र राहणार आहेत. या मुला-मुलींनी निर्धारित वेळेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून सादर करणे गरजेचे आहे.

मोफत निवास अन् भोजनाची व्यवस्थापरीक्षेद्वारे निवड केल्या जाणाऱ्या मुला-मुलींच्या निवास, भोजनाची मोफत व्यवस्था जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरातील इमारतीत केली जाणार आहे. शाळेतील प्रवेशासाठीही जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा केला जाणार आहे.

मोफत प्रशिक्षण देऊ जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांची मुलं जिल्हा परिषद, कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना दहावीनंतर जेईई, आयआयटी, नीटची तयारी करताना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील गरजू ३० विद्यार्थ्यांची परीक्षेद्वारे निवड करून जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.- वर्षा मीना, सीईओ, जि.प., जालना

टॅग्स :examपरीक्षाJalanaजालनाJalna z pजालना जिल्हा परिषद