शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना मिळणार जेईई, नीटचे मोफत धडे; जालना झेडपीच्या स्तुत्य उपक्रम

By विजय मुंडे  | Updated: June 2, 2023 18:32 IST

राज्यातील प्रथम उपक्रम; परीक्षेद्वारे होणार विद्यार्थ्यांची निवड

जालना : जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या शेतकरी, कष्टकऱ्यांच्या ३० मुला- मुलींना मोफत जेईई, आयआयटी, नीटचे धडे देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जाणार असून, परीक्षेद्वारे या ३० मुला- मुलींची निवड केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांची जेईई, आयआयटी, नीटच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी दोन वर्षात लाखो रुपयांचा खर्च पालकांना करावा लागतो. परंतु, ग्रामीण भागातील विशेषत: शेतकरी, कष्टकऱ्यांची मुलं-मुली हुशार असली तरी त्यांना हा खर्च परवडणारा नसतो. ही बाब ओळखून जिल्हा परिषदेच्या वतीने १५ मुले आणि १५ मुलींना दोन वर्ष कालावधीत अकरावी- बारावी शिक्षणासोबतच जेईई, आयआयटी, नीटचे मोफत धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून खर्च करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी ११ जून रोजी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १२० गुणांची परीक्षाजालना येथील जिल्हा परिषद प्रशालेत घेतली जाणार आहे.

मानधनावर होणार शिक्षकांची नियुक्तीविद्यार्थ्यांना फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे धडे देण्यासाठी मानधन तत्त्वावर चार तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. हे चार तज्ज्ञ या ३० विद्यार्थ्यांची पुढील दोन वर्षात जेईई, आयआयटी, नीटची तयारी करून घेणार आहेत.

या शाळांतील मुलं होणार पात्रजिल्ह्यातील जिल्हा प्रशाला व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून दहावीची परीक्षा दिलेले मुलं- मुली पात्र राहणार आहेत. या मुला-मुलींनी निर्धारित वेळेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून सादर करणे गरजेचे आहे.

मोफत निवास अन् भोजनाची व्यवस्थापरीक्षेद्वारे निवड केल्या जाणाऱ्या मुला-मुलींच्या निवास, भोजनाची मोफत व्यवस्था जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरातील इमारतीत केली जाणार आहे. शाळेतील प्रवेशासाठीही जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा केला जाणार आहे.

मोफत प्रशिक्षण देऊ जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांची मुलं जिल्हा परिषद, कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना दहावीनंतर जेईई, आयआयटी, नीटची तयारी करताना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील गरजू ३० विद्यार्थ्यांची परीक्षेद्वारे निवड करून जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.- वर्षा मीना, सीईओ, जि.प., जालना

टॅग्स :examपरीक्षाJalanaजालनाJalna z pजालना जिल्हा परिषद