शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना मिळणार जेईई, नीटचे मोफत धडे; जालना झेडपीच्या स्तुत्य उपक्रम

By विजय मुंडे  | Updated: June 2, 2023 18:32 IST

राज्यातील प्रथम उपक्रम; परीक्षेद्वारे होणार विद्यार्थ्यांची निवड

जालना : जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या शेतकरी, कष्टकऱ्यांच्या ३० मुला- मुलींना मोफत जेईई, आयआयटी, नीटचे धडे देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जाणार असून, परीक्षेद्वारे या ३० मुला- मुलींची निवड केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांची जेईई, आयआयटी, नीटच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी दोन वर्षात लाखो रुपयांचा खर्च पालकांना करावा लागतो. परंतु, ग्रामीण भागातील विशेषत: शेतकरी, कष्टकऱ्यांची मुलं-मुली हुशार असली तरी त्यांना हा खर्च परवडणारा नसतो. ही बाब ओळखून जिल्हा परिषदेच्या वतीने १५ मुले आणि १५ मुलींना दोन वर्ष कालावधीत अकरावी- बारावी शिक्षणासोबतच जेईई, आयआयटी, नीटचे मोफत धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून खर्च करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी ११ जून रोजी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १२० गुणांची परीक्षाजालना येथील जिल्हा परिषद प्रशालेत घेतली जाणार आहे.

मानधनावर होणार शिक्षकांची नियुक्तीविद्यार्थ्यांना फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे धडे देण्यासाठी मानधन तत्त्वावर चार तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. हे चार तज्ज्ञ या ३० विद्यार्थ्यांची पुढील दोन वर्षात जेईई, आयआयटी, नीटची तयारी करून घेणार आहेत.

या शाळांतील मुलं होणार पात्रजिल्ह्यातील जिल्हा प्रशाला व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून दहावीची परीक्षा दिलेले मुलं- मुली पात्र राहणार आहेत. या मुला-मुलींनी निर्धारित वेळेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून सादर करणे गरजेचे आहे.

मोफत निवास अन् भोजनाची व्यवस्थापरीक्षेद्वारे निवड केल्या जाणाऱ्या मुला-मुलींच्या निवास, भोजनाची मोफत व्यवस्था जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरातील इमारतीत केली जाणार आहे. शाळेतील प्रवेशासाठीही जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा केला जाणार आहे.

मोफत प्रशिक्षण देऊ जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांची मुलं जिल्हा परिषद, कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना दहावीनंतर जेईई, आयआयटी, नीटची तयारी करताना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील गरजू ३० विद्यार्थ्यांची परीक्षेद्वारे निवड करून जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.- वर्षा मीना, सीईओ, जि.प., जालना

टॅग्स :examपरीक्षाJalanaजालनाJalna z pजालना जिल्हा परिषद