शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
7
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
8
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
9
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
10
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
11
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
12
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
13
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
15
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
16
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
17
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
18
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
19
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
20
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

घनसावंगी तालुक्यात चिकनगुनियासदृश आजाराचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST

घनसावंगी : कोरोनाबाधितांची संख्या घटलेली असताना बदलत्या वातावरणाचा सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. घनसावंगी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सद्य:स्थितीत ...

घनसावंगी : कोरोनाबाधितांची संख्या घटलेली असताना बदलत्या वातावरणाचा सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. घनसावंगी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सद्य:स्थितीत चिकुनगुनियासदृश आजाराने डोके वर काढले आहे. सर्दी, खोकला, ताप या कोरोनाच्या लक्षणे असलेल्या आजारासह हात-पायाच्या सांधेदुखीच्या वेदनांनी रुग्ण त्रस्त असून, खासगी, शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे.

घनसावंगी शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अटोक्यात आली आहे. कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागासह ग्रामपंचायती, नगरपंचायत, महसूल, शिक्षण विभागासह विविध प्रशासकीय विभागांनी प्रयत्न केले आहेत. नागरिकांनीही सूचनांचे पालन करून लसीकरणाकडे कल दिला आहे; परंतु मागील आठ-दहा दिवसांपासून वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील हजारो नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, हात-पायाच्या सांधेदुखीचा त्रास होत आहे. बहुतांश लक्षणे कोरोनासह चिकनगुनियासदृश आजाराची आहेत. या आजारामुळे ग्रस्त झालेले रुग्ण शासकीय, खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. विशेषत: अधिक तीव्र आजार असलेल्या संशयितांची आरोग्य विभागाकडून कोरोना तपासणीही केली जात आहे. मात्र, खासगी रुग्णालयातील विविध चाचण्यांवर हजारो रुपये खर्च करण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे. खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत.

कोट

बदलत्या वातावरणामुळे व्हायरल आजाराचे रुग्ण वाढले आहेत. काहींची चाचणी केली असता कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, चिकुनगुनियासदृश रुग्ण आढळले आहेत. त्यादृष्टीने संबंधित प्रशासकीय यंत्रणेला काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. नागरिकांनी कोणताही आजार अंगावर न काढता तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार घ्यावेत.

-डॉ. नागेश सावरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी

चौकट

स्वच्छता महत्त्वाची

बदलते वतावरण आणि अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरासह परिसरात स्वच्छता ठेवावी. पिण्याचे पाणी उकळून प्यावे किंवा निर्जंतुकीकरण करून प्यावे. कोणताही आजार असेल तर घरगुती औषधोपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.