शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

घनसावंगी तालुक्यात चिकनगुनियासदृश आजाराचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST

घनसावंगी : कोरोनाबाधितांची संख्या घटलेली असताना बदलत्या वातावरणाचा सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. घनसावंगी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सद्य:स्थितीत ...

घनसावंगी : कोरोनाबाधितांची संख्या घटलेली असताना बदलत्या वातावरणाचा सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. घनसावंगी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सद्य:स्थितीत चिकुनगुनियासदृश आजाराने डोके वर काढले आहे. सर्दी, खोकला, ताप या कोरोनाच्या लक्षणे असलेल्या आजारासह हात-पायाच्या सांधेदुखीच्या वेदनांनी रुग्ण त्रस्त असून, खासगी, शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे.

घनसावंगी शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अटोक्यात आली आहे. कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागासह ग्रामपंचायती, नगरपंचायत, महसूल, शिक्षण विभागासह विविध प्रशासकीय विभागांनी प्रयत्न केले आहेत. नागरिकांनीही सूचनांचे पालन करून लसीकरणाकडे कल दिला आहे; परंतु मागील आठ-दहा दिवसांपासून वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील हजारो नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, हात-पायाच्या सांधेदुखीचा त्रास होत आहे. बहुतांश लक्षणे कोरोनासह चिकनगुनियासदृश आजाराची आहेत. या आजारामुळे ग्रस्त झालेले रुग्ण शासकीय, खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. विशेषत: अधिक तीव्र आजार असलेल्या संशयितांची आरोग्य विभागाकडून कोरोना तपासणीही केली जात आहे. मात्र, खासगी रुग्णालयातील विविध चाचण्यांवर हजारो रुपये खर्च करण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे. खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत.

कोट

बदलत्या वातावरणामुळे व्हायरल आजाराचे रुग्ण वाढले आहेत. काहींची चाचणी केली असता कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, चिकुनगुनियासदृश रुग्ण आढळले आहेत. त्यादृष्टीने संबंधित प्रशासकीय यंत्रणेला काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. नागरिकांनी कोणताही आजार अंगावर न काढता तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार घ्यावेत.

-डॉ. नागेश सावरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी

चौकट

स्वच्छता महत्त्वाची

बदलते वतावरण आणि अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरासह परिसरात स्वच्छता ठेवावी. पिण्याचे पाणी उकळून प्यावे किंवा निर्जंतुकीकरण करून प्यावे. कोणताही आजार असेल तर घरगुती औषधोपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.