शहरं
Join us  
Trending Stories
1
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
2
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
3
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
4
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
5
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
6
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
7
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
8
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
9
स्मार्टफोनची बॅटरी धडाधड उतरतेय? पटकन ऑन करा 'या' ५ सेटिंग्स; बॅटरीची होईल दुप्पट बचत
10
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
11
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
12
U19 World Cup 2026 Schedule : ICC चा मोठा निर्णय; वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या गटातून पाकिस्तान बाहेर
13
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
'राज' सिनेमातली 'ती' आज कुठे गायब? भूताच्या भूमिकेत दिसली; बिपाशा बासूवरही पडलेली भारी
15
निरोगी त्वचा, मजबूत केस, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते मेथी; 'हे' आहेत १० जबरदस्त फायदे
16
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
17
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
18
PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत
19
ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा
20
कार्तिक अमावस्या २०२५: गुरुवार, २० नोव्हेंबर कार्तिक अमावस्या; 'या' ७ राशींना छोटी चूकही पडू शकते महाग
Daily Top 2Weekly Top 5

घनसावंगी तालुक्यात चिकनगुनियासदृश आजाराचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST

घनसावंगी : कोरोनाबाधितांची संख्या घटलेली असताना बदलत्या वातावरणाचा सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. घनसावंगी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सद्य:स्थितीत ...

घनसावंगी : कोरोनाबाधितांची संख्या घटलेली असताना बदलत्या वातावरणाचा सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. घनसावंगी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सद्य:स्थितीत चिकुनगुनियासदृश आजाराने डोके वर काढले आहे. सर्दी, खोकला, ताप या कोरोनाच्या लक्षणे असलेल्या आजारासह हात-पायाच्या सांधेदुखीच्या वेदनांनी रुग्ण त्रस्त असून, खासगी, शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे.

घनसावंगी शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अटोक्यात आली आहे. कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागासह ग्रामपंचायती, नगरपंचायत, महसूल, शिक्षण विभागासह विविध प्रशासकीय विभागांनी प्रयत्न केले आहेत. नागरिकांनीही सूचनांचे पालन करून लसीकरणाकडे कल दिला आहे; परंतु मागील आठ-दहा दिवसांपासून वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील हजारो नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, हात-पायाच्या सांधेदुखीचा त्रास होत आहे. बहुतांश लक्षणे कोरोनासह चिकनगुनियासदृश आजाराची आहेत. या आजारामुळे ग्रस्त झालेले रुग्ण शासकीय, खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. विशेषत: अधिक तीव्र आजार असलेल्या संशयितांची आरोग्य विभागाकडून कोरोना तपासणीही केली जात आहे. मात्र, खासगी रुग्णालयातील विविध चाचण्यांवर हजारो रुपये खर्च करण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे. खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत.

कोट

बदलत्या वातावरणामुळे व्हायरल आजाराचे रुग्ण वाढले आहेत. काहींची चाचणी केली असता कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, चिकुनगुनियासदृश रुग्ण आढळले आहेत. त्यादृष्टीने संबंधित प्रशासकीय यंत्रणेला काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. नागरिकांनी कोणताही आजार अंगावर न काढता तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार घ्यावेत.

-डॉ. नागेश सावरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी

चौकट

स्वच्छता महत्त्वाची

बदलते वतावरण आणि अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरासह परिसरात स्वच्छता ठेवावी. पिण्याचे पाणी उकळून प्यावे किंवा निर्जंतुकीकरण करून प्यावे. कोणताही आजार असेल तर घरगुती औषधोपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.