शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची आंदोलनाकडे पाठ, आंदोलनकर्ते नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

महाकाळा (अंकुशनगर) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मागील १९ दिवसांपासून अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन ...

महाकाळा (अंकुशनगर) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मागील १९ दिवसांपासून अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद येथे येऊन गेले. जवळ असूनही ते आंदोलनाकडे फिरकले नसल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाकडून केली जाणारी टाळाटाळ पाहता, अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गावातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला १९ दिवसांत तब्बल १ हजारपेक्षा अधिक गावांतील ग्रामस्थांनी भेटी दिल्या आहेत. बहुतांश ठिकाणी दुचाकी रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. सरकारला जागे करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन देखील सुरू करण्यात आले; परंतु तरीही सरकारने दुर्लक्ष केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह इतर मंत्र्यांनी आंदोलनाला भेटी देऊन पाठिंबा दर्शविला आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद येऊन गेले. जवळ येऊनही त्यांनी आंदोलनाला भेट न दिल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्यात तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यातच मागील २० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी देखील भेट दिली नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी वैभव औताडे, अभिषेक पैठणे, विकास औटे, परमेश्वर कासुळे, अशोक घुमरे, श्याम तांबडे आदींची उपस्थिती होती.