शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

छत्रपतींचे रयतेचे राज्य समतेचे, स्वातंत्र्य न्यायाचे - म्हस्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST

जालना : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले होते. या राज्यामध्ये सर्व जनता सुरक्षित ...

जालना : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले होते. या राज्यामध्ये सर्व जनता सुरक्षित व स्वातंत्र्याचे जीवन जगत होती. याचे कारण रयतेमध्ये समता होती, न्याय होता आणि स्वातंत्र्य होते, असे प्रतिपादन राजकुमार म्हस्के यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संघर्षनगर इंदेवाडी येथे प्राचार्य राजकुमार म्हस्के यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी म्हस्के म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले होते. या राज्यामध्ये सर्व जनता सुरक्षित व स्वातंत्र्याचे जीवन जगत होती. याचे कारण रयतेमध्ये समता होती, न्याय होता आणि स्वातंत्र्य होते. सर्वसामान्यांचे जीवनमान सुखकर होण्यासाठी छत्रपती अहोरात्र झटत होते. छत्रपतींना सहा भाषांचे ज्ञान होते. आपल्या कुशल, शौर्यवान व्यक्तिमत्वाची छाप त्याकाळी छत्रपतींनी सर्वसामान्य माणसावर उमटवली होती. रयतेची मदत, सेवा करणे म्हणजेच पुण्य आणि रयतेला वाऱ्यावर सोडणे म्हणजे पाप होय, अशा महान विचारांची निर्मिती छत्रपतींनी त्याकाळी केली. त्यामुळे त्यांचे जीवनकार्य विश्वासाठी आदर्श ठरून त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यावर देश-विदेशात अभ्यासक्रम आणि संशोधन केले जात आहे, असेही म्हस्के म्हणाले. यावेळी रमेश डोळसे, तांदुळवाडी सरपंच अण्णासाहेब चित्तेकर, वाघोळा उपसरपंच ज्ञानदेव घुगे, कपिल खरात, सुरेश उघडे, फकिरा वाघ, देविदास वाघ, बाळू बोर्डे, अरुण सुर्वे, मनोहर उघडे, प्रभू मनवर, सुनील निकाळजे, गणपत कांबळे, सिंधू वाघ, सुहास साळवे, विनोद वाघ, विकास वाघ आदी उपस्थित होते.