शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींचे रयतेचे राज्य समतेचे, स्वातंत्र्य न्यायाचे - म्हस्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST

जालना : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले होते. या राज्यामध्ये सर्व जनता सुरक्षित ...

जालना : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले होते. या राज्यामध्ये सर्व जनता सुरक्षित व स्वातंत्र्याचे जीवन जगत होती. याचे कारण रयतेमध्ये समता होती, न्याय होता आणि स्वातंत्र्य होते, असे प्रतिपादन राजकुमार म्हस्के यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संघर्षनगर इंदेवाडी येथे प्राचार्य राजकुमार म्हस्के यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी म्हस्के म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले होते. या राज्यामध्ये सर्व जनता सुरक्षित व स्वातंत्र्याचे जीवन जगत होती. याचे कारण रयतेमध्ये समता होती, न्याय होता आणि स्वातंत्र्य होते. सर्वसामान्यांचे जीवनमान सुखकर होण्यासाठी छत्रपती अहोरात्र झटत होते. छत्रपतींना सहा भाषांचे ज्ञान होते. आपल्या कुशल, शौर्यवान व्यक्तिमत्वाची छाप त्याकाळी छत्रपतींनी सर्वसामान्य माणसावर उमटवली होती. रयतेची मदत, सेवा करणे म्हणजेच पुण्य आणि रयतेला वाऱ्यावर सोडणे म्हणजे पाप होय, अशा महान विचारांची निर्मिती छत्रपतींनी त्याकाळी केली. त्यामुळे त्यांचे जीवनकार्य विश्वासाठी आदर्श ठरून त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यावर देश-विदेशात अभ्यासक्रम आणि संशोधन केले जात आहे, असेही म्हस्के म्हणाले. यावेळी रमेश डोळसे, तांदुळवाडी सरपंच अण्णासाहेब चित्तेकर, वाघोळा उपसरपंच ज्ञानदेव घुगे, कपिल खरात, सुरेश उघडे, फकिरा वाघ, देविदास वाघ, बाळू बोर्डे, अरुण सुर्वे, मनोहर उघडे, प्रभू मनवर, सुनील निकाळजे, गणपत कांबळे, सिंधू वाघ, सुहास साळवे, विनोद वाघ, विकास वाघ आदी उपस्थित होते.