शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना न्याय दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:48 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन प्रत्येकाला न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे कुठल्याही जाती-धर्माचा द्वेष न करता शिवरायांचे विचार आचारणात आणावे, असे आवाहन शिवाजी महाराजाचे तेरावे वंशज छत्रपती खा़ संभाजी राजे भोसले यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन: छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन प्रत्येकाला न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे कुठल्याही जाती-धर्माचा द्वेष न करता शिवरायांचे विचार आचारणात आणावे, असे आवाहन शिवाजी महाराजाचे तेरावे वंशज छत्रपती खा़ संभाजी राजे भोसले यांनी केले.भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे शिवजयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. संतोष दानवे, निर्मला दानवे, रामेश्वरचे चेअरमन विजयसिंह परिहार, उपसभापती भास्कर दानवे, सुरेश बनकर, सभापती कौतिकराव जगताप, विलास आडगावकर, साहेबराव कानडजे, भाऊसाहेब जाधव यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना संभाजीराजे भोसले म्हणले की, जळगाव सपकाळ सारख्या छोट्याशा गावात महाराजांचा उभारलेला हा आश्वरूढ पुतळा सर्वांनी आर्दश घेण्यासारखा आहे. पुतळा उभारल्यामुळे येणा-या काळात त्यांच्या विचारांचे पालन करण्याची जबाबदारी गावातील प्रत्येकावर आहे. यावर्षी महाराजाची जयंती दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीती साजरी करण्यात आली. त्यामुळे महाराजांचे कार्य हे केवळ दिल्लीपर्यंतच नाही तर जगभरामध्ये पोहोचले. खा़ दानवे म्हणाले की, जळगाव सपकाळ या येथूनच कै. माजी आ़ विठ्ठलरावअण्णा यांच्याकडून राजकारण शिकलो. त्यामुळे या गावाशी माझी कायम नाळ जोडली गेली. आ. दानवे म्हणाले, की गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे काम पूर्ण होऊन काही महिने झाले. पुतळा अनावरणासाठी छत्रपती संभाजी राजे यांनाच आणावे असा आग्रह गावकºयांनी केला होता. त्यामुळे त्यांना निमंत्रण दिले व त्यांनी ते स्वीकारले. यावेळी आऱ ए़सपकाळ, डॉ. हेमंत सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष राजेद्र देशमुख, गोविंंदराव पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश सपकाळ, जिल्हापरिषद सदस्य आशा पांडे, मुकेश पांडे, सुनीता सपकाळ, शाकिलराम म्हस्के, संतोष लोखंडे, डॉ. चंद्रकांत साबळे, विंठ्ठल चिंचपुरे आदींची उपस्थिती होती.