शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सा.बां. विभागाची बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:54 IST

पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश असताना २५ दिवसांनंतरही समितीने काँक्रिटीकरणाची तपासणी केलेली नसल्याचे आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहर खड्डेमुक्त करण्याच्या दृष्टीने २५ कोटी रुपये खर्चून प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या अनेक तक्रारी सा. बां. विभाग व प्रशासनाकडे करण्यात आल्या. लोकमतने वृत्तमालिकेद्वारे यावर प्रकाशझोत टाकला. त्यावर सा. बां. विभागाने समिती नेमून याची तपासणी करण्याचे आदेश दिले. पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश असताना २५ दिवसांनंतरही समितीने काँक्रिटीकरणाची तपासणी केलेली नसल्याचे आढळून आले आहे.शहरात अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खड्ड््यांचे साम्राज्य पसरले होते. दर सहा महिन्यांनी या रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात होते. पालिकेचा निधी यातच जात होता. यावर कायमस्वरुपी पर्याय म्हणून राज्य शासनाने विशेष बाब म्हणून रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी २५ कोटी रुपयांचा निधी दिला. या निधीतून चांगले आणि दर्जेदार काम होण्यासाठी नगर पालिकेकडे हे काम न देता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आले. जवळपास सहा ते आठ एजन्सीजना या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे कंत्राट देण्यात आले. यातील बहुतांश कामे ही निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे मांडल्या. त्यानंतर लोकमतनेही वृत्तमालिकेद्वारे सार्वजनिक बांधकाम आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली २६ नोव्हेंबर रोजी पाच सदस्यीय समिती नेमली. या समितीला शहरातील काँक्रिटीकरणाची तपासणी करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या समिती स्थापनेला महिना झाला असला तरी अद्याप समितीने या कामांची तपासणी केली नसल्याचे दिसून येते. एकूणच रस्त्यांचे काँक्रिटीकरण चांगल्या दर्जाचे झाले असते तर जालनेकरांची कायमस्वरुपी खड््ड्यांतून मुक्तता झाली असती. पण कामांचा दर्जा राखला न गेल्याने याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, आगामी काही महिन्यांत याच रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडण्याची भीती व्यक्त होत आहे. रस्ते कामांच्या तपासणीसाठी चौकशी समिती स्थापन करुन सा. बां. विभागाने केवळ देखावा केल्याचे या निमित्ताने उघड होेत आहे. जनतेच्या कररुपी पैशांतून झालेली ही विकास कामे अल्पायुषी ठरणार असल्याने केवळ निधीचा अपव्यय झाल्याचे नागरिकांंतून बोलले जात आहे. यासंदर्भात सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.