शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

गुंतवणुकीसह उद्योग वाढीसाठी शेलगाव ते बदनापूरदरम्यान एमआयडीसीचा चाैथा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:28 IST

जालना शहर हे पूर्वीपासूनच व्यापार, उद्योगांसाठी ओळखले जाते. जालन्यात डाळ मिल, जिनिंग, तसेच आरमशिनसह लोखंडी कारखाने, बेअरिंग्ज तयार करणारी ...

जालना शहर हे पूर्वीपासूनच व्यापार, उद्योगांसाठी ओळखले जाते. जालन्यात डाळ मिल, जिनिंग, तसेच आरमशिनसह लोखंडी कारखाने, बेअरिंग्ज तयार करणारी एनआरबी, मोटारसायकलच्या चेन तयार करणारी एलजीबी या कंपन्यांसह अनेक लघु उद्योग येथे विस्तारले आहेत. ही बाब लक्षात घेऊन जुनी एमआयडीसी ही जेईएस महाविद्यालयाजवळ होती. तो पहिला औद्योगिक वसाहतीचा पहिला टप्पा म्हणून ओळखला जात असे. त्यानंतर जालना - औरंगाबाद मार्गावर एमआयडीसीचा जवळपास ४०० एकर परिसरावर दुसरा टप्पा १९८० च्या दशकात विकसित केला होता. आज याच टप्प्यात स्टीलसह वर उल्लेखित उद्योग विस्तारले आहेत. हा टप्पाही उद्योगांना कमी पडू लागल्याने शासकीय तंत्रनिकेतनजवळ औद्योगिकचा तिसरा टप्पा विकसित केला आहे. या तिन्ही टप्प्यात आता नवीन उद्योजकांसाठी जवळपास भूखंडच उपलब्ध नाहीत.

असे असताना अनेक बड्या उद्योजकांनी तिसऱ्या टप्प्यात मोठ-मोठे भूखंड स्वत:च्या नावावर खरेदी केले आहेत. परंतु तेथे काही मोजके उद्योग वगळता अन्य उद्योजकांनी त्यांचे भूखंड विकसित केले नसल्याचे वास्तव आहे. काही ठराविक वर्षात भूखंड एमआयडीसीकडून घेतल्यावर तेथे नवीन उद्योग उभारणे बंधनकारक असते. परंतु हे उद्योजक आपले सर्व वजन वापरून या भूखंडांच्या विकासासाठी मुदतवाढ घेऊन भूखंड हातातून सोडत नाहीत. ही देखील एक गंभीर बाब आहे.

जालन्यात कुशलसह अन्य मनुष्यबळ सहज उपलब्ध होते. तसेच येथे उद्योगांसाठी लागणारे वातावरण देखील सकारात्मक आहे. त्यामुळे आगामी काळात येथे अनेक उद्योग येऊ शकतात. परंतु यासाठी राजकीय मानसिकता बदलण्याची गरज पडणार आहे. आज औरंगाबाद ज्या पध्दतीने विकसित झाले, त्या पध्दतीवर जालन्यातही अनेक बडे उद्योग येण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांना येथील जमीन, वीज, तसेच अन्य महत्त्वाच्या सुविधा देणे गरजेचे आहे. परंतु याचा अभाव येथे प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर दिसून येत आहे.

श्रीमंतांकडून जमीन खरेदीच्या हालचाली

भविष्यात जालन्यातून थेट परदेशात निर्यात करणे शक्य होणार असून, त्यासाठी ड्रायपोर्टच्या कामाला आता शेवटचा धक्का देण्याची गरज आहे. याच भागात शेलगाव ते बदनापूर यादरम्यान एमआयडीसीकडून चौथा औद्योगिक विकासाचा टप्पा प्रस्तावित होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ही केवळ चर्चा असली तरी, अनेक श्रीमंतांकडून ही कुणकुण लागताच, शेलगाव ते बदनापूरजवळील ड्रायपोर्टच्या आसपासच्या शेतजमिनी खरेदीसाठी सरसावले असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. ही जमीन आता खरेदी करून नंतर हीच जमीन एमआयडीसीने संपादित केल्यास बाजारभावाच्या पाचपट भाव मिळत असल्याने अनेकजण याकडे वळल्याचे चित्र आहे.