शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मध्यवर्ती बँकेस ३७० पदांची मान्यता : भरती केवळ ९२ जणांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST

असे असतानाच बँकेच्या जवळपास ६४ शाखा असून, विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून या बँकेचे कामकाज हे ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचले ...

असे असतानाच बँकेच्या जवळपास ६४ शाखा असून, विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून या बँकेचे कामकाज हे ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या बँकेवर अतूट विश्वास आहे. आजही या बँकेत जवळपास ३५० कोटी रुपयांच्या ठेवी असून, पीककर्ज वाटपात अन्य बँकांच्या तुलनेने या बँकेने कमी कर्मचारी असतांना मोठी कामगिरी केली आहे. परंतु हे सर्व करत असतांना नवीन पदे भरण्यास मान्यता मिळत नव्हती. ती मान्यता मिळविण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे, बँकेचे उपाध्यक्ष तथा आ. कैलास गोरंट्याल, बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड तसेच बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख यांनी बराच पाठपुरावा करून सहकार आयुक्त तसेच सहकार मंत्र्यांकडे पाठपुरावा करून बँकेतील रिक्त जागा भरण्यासाठी जवळपास ३७० जागांना मान्यता आणली. परंतु काही निकष आजही कायम असल्याने बँकेला केवळ ९२ कर्मचाऱ्यांचीच भरती करता येणार आहे.

चौकट

बऱ्याच वर्षांनंतर ही पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे संगणकाचे ज्ञान तसेच उच्च शिक्षण असणाऱ्यांना यात प्राधान्य देऊन तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी भरण्यासाठीचे आमचे प्रयत्न राहतील. पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासह सर्व पक्षीय संचालक मंडळाने बँकेच्या प्रगतीसाठी जी साथ दिली, ती अशीच पुढेही कायम राहिल्यास बँकेचे गतवैभव पुन्हा प्राप्त होईल.

मनोज मरकड, अध्यक्ष जि. म. बँक, जालना