शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बिबट्या कॅमेऱ्यात कैद; पण पिंज-यात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंबड तालुक्यातील वडीगोद्री व परिसरात बिबट्याच्या दहशतीने परिसरातील दहशत कायम आहे. या बिबट्याने वडीगोद्री जवळील गुंडेवाडी परिसरात बुधवारी ग्रामस्थांना पुन्हा दर्शन दिले. मात्र या बिबट्याने कोणावर हल्ला केला नाही. मात्र, या भागात बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले असून, बिबट्याच्या हालचाली चार दिवसांपूर्वीच वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमे-यात कैद ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंबड तालुक्यातील वडीगोद्री व परिसरात बिबट्याच्या दहशतीने परिसरातील दहशत कायम आहे. या बिबट्याने वडीगोद्री जवळील गुंडेवाडी परिसरात बुधवारी ग्रामस्थांना पुन्हा दर्शन दिले. मात्र या बिबट्याने कोणावर हल्ला केला नाही. मात्र, या भागात बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले असून, बिबट्याच्या हालचाली चार दिवसांपूर्वीच वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमे-यात कैद झाल्या आहेत. हा बिबट्या तीन वर्षाचा असावा असे अनुमान काढले आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात एकजण ठार झाला आहे.गेल्या दोन महिन्यापासून वडीगोद्री तसेच परिसरातील काही गावात बिबट्या आल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाला दिली होती. दरम्यानच्या काळात या बिबट्याने परिसरातील अनेक गायी, म्हशी, वासरावर हल्ला करून आपली भूक भागविली होती. मात्र, आता या भागातील ग्रामस्थांना या बिबट्याची जणूकाही सवयच झाली अशा स्थितीत आता भीती दूर झाल्याचे ग्रामस्थांनी वन विभागातील अधिकाºयांना सांगितले. असे असले तरी ग्रामस्थांनी या भ्रमात राहू नये, तो हिंस्त्र प्राणी आहे. तो केव्हाही हल्ला करू शकतो. अशी सूचना दिली आहे.वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या परिसरात यापूर्वीच तीन पिंजरे लावले आहेत. तसेच तीन पथकांची स्थापना केली असून, वनविभागाचे चार कर्मचारी हे परिसरात रात्रीची गस्त तसेच वेळप्रसंगी मुक्काम करत असल्याची माहिती जालना येथील वनिविभागाचे वरिष्ठ अधिकारी जी.एम. शिंदे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. बिबट्याचे दर्शन हे वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमे-यात टीपल्या आहेत. तसेच तो शार्प शूटर आणि वैद्यकीय पथकाच्या नजरेसही आला होता. त्याला बेशुद्ध करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली असतानाच तो त्या भागातील उसाच्या शेतात पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.बुधवारी रात्री देखील पथकातील सदस्य जागता पहारा देणार आहेत. कुठल्याही स्थितीत त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.पाणी सोडल्याने अडचण : जी. एम. शिंदेपैठण येथील नाथसागरातून वडीगोद्री जवळील उजव्या कालव्याला गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी सोडले आहे. हे पाणी परिसरातील शेतक-यांनी उसाला दिले आहे. त्यामुळे पूर्वी पाणी आणि भक्ष्याच्या शोधात बिबट्या उसाच्या शेतातून बाहेर पडत होता.मात्र, आता त्याला उसाच्या शेतात पाणी मिळत असल्याने तो क्वचितच बाहेर येत आहे. भूक लागल्यावरच तो बाहेर पडणार असल्याने त्याच्या हालचालींवर आता बारकाईने लक्ष दिले जात असल्याचे सहायक वनसंरक्षक अधिकारी जी.एम. शिंदे यांनी सांगितले.धावडा येथे गायीचा फडशाधावडा : भोकरदन तालुक्यातील मेहगाव परिसरात बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. बुधवारी सकाळी या भागातील शेतकरी शेरखान सरदार खान पठाण यांच्या शेतात बिबट्याने गोठ्यातील बांधलेल्या गायीचा फडशा पाडला. सकाळी पठाण यांचा मुलगा इब्राहीम खान हा शेतात आला असता त्याला गोठ्यात गाय न दिसल्याने शोध घेतला असता मक्याच्या शेतात बिबट्या दिसल्याने तो घाबरून गेला. त्याने आरडा-ओरड केल्याने परिसरातील शेतकरी धावून आले. तोपर्यंत बिबट्याने तेथून पळ काढला होता. याच भागातील जाहेद गुलाब यांनाही बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले. ही माहिती वन विभागाला कळविली आहे. या प्रकारामुळे भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग