शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

बाहेरच्या मतदारांसाठी उमेदवारांचा आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

अशा वेळी कामाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना मतदानासाठी बोलाविण्याचे नियोजन सध्या उमेदवारांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...

अशा वेळी कामाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना मतदानासाठी बोलाविण्याचे नियोजन सध्या उमेदवारांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. आजपासून काही महिन्यांपूर्वी कोरोनाच्या काळात शहरातील अनेकजण आपल्या गावाकडे परतले होते. अशा वेळी काही गावांनी या आपल्या बांधवांचे गावी स्वागत केले; तर काही गावांनी गावात येणाऱ्या रस्त्यांंवर काठ्या लावून त्यांना ‘नो एंट्री’ म्हणून बजावले होते. तेव्हा पाय ठेवू दिला नाही. आता मात्र मोठ्या आस्थेने याच मतदारांची विचारपूस केली जात आहे. ‘काहीही करा; पण आमच्यासाठी एक दिवस द्या,’ अशा विनवण्या गावागावांतून केल्या जात आहेत. ‘तेव्हा काटे अंथरले, आता कशाला पायघड्या घालता’ असे म्हणून अनेकजण हिशेब चुकता करीत आहेत. असे असले तरी कोरोनाकाळात ज्या ग्रामस्थांनी सहारा दिला, क्वारंटाईन सेंटरवर भाकरी पुरविल्या, अशांसाठी मतदार ही तुमच्यासाठी काहीपण म्हणत मतदानाला येण्याचे ठाम आश्वासन देत आहेत. सध्या ग्रामपंचायतीची निवडणूक होत असलेल्या अनेक गावांत बाहेरगावचे मतदान आणण्यासाठी उमेदवारांचा चाललेला आटापिटा गावात चर्चेचा विषय बनला आहे, हे मात्र तितकेच खरे.