शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

रोहयोच्या कामावर बहिष्कार बीडीओ साहेबांचा, उपासमार १६ हजार मजुरांची

By विजय मुंडे  | Updated: April 27, 2023 19:40 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची १,२१५ कामे ठप्प; लाभार्थी शेतकऱ्यांचीही गैरसोय

जालना : शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील अनेक जबाबदाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावर टाकल्या आहेत. याला विरोध दर्शवित जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी रोहयोच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. परिणामी, जिल्ह्यात सुरू असलेली १,२१५ कामे ठप्प झाली असून, १६ हजार १५७ मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

रोहयोंतर्गत जिल्हा परिषद पंचायत समिती विभागाकडून गावस्तरावर विविध कामे केली जात आहेत. अंबड तालुका वगळता इतर सात तालुक्यांतील २३९ ग्रामपंचायतींतर्गत जवळपास १,२१५ कामे रोहयोंतर्गत सुरू होती. त्यात सिंचन विहिरींची कामे, सार्वजनिक विहिरींची कामे, मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे, शोषखड्ड्यांची कामे, बांधावर वृक्षलागवड, शेततळे यासह इतर अनेक कामे राेहयोंतर्गत सुरू होती. या कामांवर १६,१५७ मजूर कार्यरत होते; परंतु, शासनाने रोहयोंतर्गत कामातील जबाबदारीत बदल केले आहेत. ग्रामपंचायतस्तरावरील साप्ताहिक हजेरी यापूर्वी रोजगार सेवक करीत होता. त्यावर ग्रामसेवक प्रतिस्वाक्षरी करीत होते. आता मात्र रोजगार हमीच्या कामांचे नियोजन करताना कुशल व अकुशल कामांचे ६०:४० प्रमाण राखण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

रोजगार सेवक घेत असलेल्या हजेरीपत्रकावर प्रतिस्वाक्षरी करावी लागणार आहे; परंतु ग्रामपंचायतस्तरावर यंत्रणा असतानाही ही जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी या कामांवरच बहिष्कार टाकला आहे. तालुक्यातील सर्व कामांवर लक्ष ठेवताना गटविकास अधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. यासह इतर विविध कारणे देत गटविकास अधिकाऱ्यांनी रोहयोच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. परिणामी, जिल्ह्यातील २३९ ग्रामपंचायतींतर्गत सुरू असलेली १,२१५ कामे बंद पडली आहेत. तर या कामांवर कार्यरत १६ हजार १५७ मजुरांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, राज्यस्तरीय संघटनेच्या निर्देशानुसार कामांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे एका गटविकास अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

मजूर म्हणतात...रोहयोंतर्गत खोराड सावंगी येथे पाणंद रस्त्याचे काम सुरू आहे. १३ ते १८ एप्रिलदरम्यान १०५ मजूर होते. मस्टर काढल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकला. त्यामुळे पैसे मिळालेले नाहीत. हा बहिष्कार मागे घ्यावा. तातडीने मजुरी देण्यासह मजुरांच्या हाताला कामे द्यावीत.- तुकाराम राठोड, खोराड सावंगी

उपासमारीची वेळ माझ्या कुटुंबात दोन मुले लहान आहेत. मी व पत्नी आम्ही दोघेही रोजगार हमी योजनेचे काम करतो. काम सुरू झाल्यावर अधिकारी संपावर गेले. आम्ही पाणंद रस्त्यावर चार दिवस काम केले. काम करूनही मजुरी मिळाली नाही. हाताला काम नसल्याने, मजुरी मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.- राम मांगीलाल चव्हाण, मजूर

टॅग्स :Jalanaजालनाagricultureशेती