शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बीओटीचा नुसताच बोलबाला, उत्पन्न शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:10 IST

शहरातील मुर्गी तलाव परिसरातील जवाहरबाग आणि श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या दुकानांचा वाद न्यायालयात गेला आहे. त्यामुळे तेथून तूर्तास तरी पालिकेला कवडीचे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मुर्गी तलाव परिसरातील जवाहरबाग आणि श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या दुकानांचा वाद न्यायालयात गेला आहे. त्यामुळे तेथून तूर्तास तरी पालिकेला कवडीचे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच जवाहरबाग नामशेष झाली आहे, तर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातही अभ्यासकेंद्र प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे मुखर्जी उद्यानाच्या सुशोभीकरणावर काही वर्षांपूर्वी तब्बल ३० लाख रुपयांचा निधी खर्च झालेला आहे.निजामकाळात तलाव असलेला हा भाग. नागरिकांसाठी पालिकेने याचे उद्यानात रुपांतर केले. बच्चे कंपनीसाठी खेळाचे साहित्य व हिरवळ तयार करण्यात आली. नवीन जालनेकरांचा विरंगुळा व्हावा म्हणून जवाहरबाग विकसित करण्यात आली. येथेही काही वर्षांपूर्वी बांधा वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर १२ दुकाने बांधण्यात आली. दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ही जमीन शासनाची असल्याचे सांगत पालिकेचा यावरील हक्क नाकारला. आता दुकानांचा वाद हा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे हे बांधकाम पालिकेसाठी डोकेदुखीच ठरले आहे. दुसरीकडे या उद्यानाच्या बहुतांश भागावर अतिक्रमण झाले असून, यावर काहींनी पक्की घरेही बांधली आहेत. तर उर्वरित जागेवर बाजार भरवला जात आहे. उद्यान तर नामशेष झालेच; शिवाय काही जागाही पालिकेच्या हातची गेली आहे.डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळाचे एक प्रमुख केंद्र होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी खा. रावसाहेब दानवे यांच्या खासदार निधीतून २० लाख, स्थानिक आमदार निधीतून ५ लाख आणि पालिकेचा ५ लाख, असा ३० लाख रुपयांचा निधी या उद्यानाच्या सुशोभीकरणावर खर्च करण्यात आला. यात भिंत, कारंजे, आसन व्यवस्था, हिरवळ, विविध वृक्षलागवड आदींचा अंतर्भाव होता. त्याच वेळी पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी १२ गाळे बीओटी तत्त्वावर बांधण्याचे पालिका प्रशासन आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींनी निश्चित केले. हाही वाद सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे पालिका अधिका-यांनी सांगितले. अद्याप यातून पालिकेला छदामही मिळालेला नाही. पालिकेच्या मालकीच्या भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये म्हणून व उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेले गाळेच आज पालिकेसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. तर काही दिवसांपूर्वी याच उद्यानात अभ्यासकेंद्र सुरु करण्यासाठी खा. दानवे यांनी २ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. याचे कामही लवकरच सुरु होणार असल्याचे समजते. त्यामुळे हे उद्यान नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.