शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

बीओटीचा नुसताच बोलबाला, उत्पन्न शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:10 IST

शहरातील मुर्गी तलाव परिसरातील जवाहरबाग आणि श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या दुकानांचा वाद न्यायालयात गेला आहे. त्यामुळे तेथून तूर्तास तरी पालिकेला कवडीचे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मुर्गी तलाव परिसरातील जवाहरबाग आणि श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या दुकानांचा वाद न्यायालयात गेला आहे. त्यामुळे तेथून तूर्तास तरी पालिकेला कवडीचे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच जवाहरबाग नामशेष झाली आहे, तर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातही अभ्यासकेंद्र प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे मुखर्जी उद्यानाच्या सुशोभीकरणावर काही वर्षांपूर्वी तब्बल ३० लाख रुपयांचा निधी खर्च झालेला आहे.निजामकाळात तलाव असलेला हा भाग. नागरिकांसाठी पालिकेने याचे उद्यानात रुपांतर केले. बच्चे कंपनीसाठी खेळाचे साहित्य व हिरवळ तयार करण्यात आली. नवीन जालनेकरांचा विरंगुळा व्हावा म्हणून जवाहरबाग विकसित करण्यात आली. येथेही काही वर्षांपूर्वी बांधा वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर १२ दुकाने बांधण्यात आली. दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ही जमीन शासनाची असल्याचे सांगत पालिकेचा यावरील हक्क नाकारला. आता दुकानांचा वाद हा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे हे बांधकाम पालिकेसाठी डोकेदुखीच ठरले आहे. दुसरीकडे या उद्यानाच्या बहुतांश भागावर अतिक्रमण झाले असून, यावर काहींनी पक्की घरेही बांधली आहेत. तर उर्वरित जागेवर बाजार भरवला जात आहे. उद्यान तर नामशेष झालेच; शिवाय काही जागाही पालिकेच्या हातची गेली आहे.डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळाचे एक प्रमुख केंद्र होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी खा. रावसाहेब दानवे यांच्या खासदार निधीतून २० लाख, स्थानिक आमदार निधीतून ५ लाख आणि पालिकेचा ५ लाख, असा ३० लाख रुपयांचा निधी या उद्यानाच्या सुशोभीकरणावर खर्च करण्यात आला. यात भिंत, कारंजे, आसन व्यवस्था, हिरवळ, विविध वृक्षलागवड आदींचा अंतर्भाव होता. त्याच वेळी पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी १२ गाळे बीओटी तत्त्वावर बांधण्याचे पालिका प्रशासन आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींनी निश्चित केले. हाही वाद सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे पालिका अधिका-यांनी सांगितले. अद्याप यातून पालिकेला छदामही मिळालेला नाही. पालिकेच्या मालकीच्या भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये म्हणून व उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेले गाळेच आज पालिकेसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. तर काही दिवसांपूर्वी याच उद्यानात अभ्यासकेंद्र सुरु करण्यासाठी खा. दानवे यांनी २ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. याचे कामही लवकरच सुरु होणार असल्याचे समजते. त्यामुळे हे उद्यान नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.