शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

मुलांच्या भावविश्वात रमण्यात निखळ आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:04 IST

बालकुमार महोत्सवासारख्या उपक्रमातून मुलांच्या भावविश्वात रमण्यासारखा निर्मळ आनंद पैशाने मोजता येत नाही, असे प्रतिपादन बालसाहित्यिक प्रशांत गौतम यांनी सोमवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बालकुमार महोत्सवासारख्या उपक्रमातून मुलांच्या भावविश्वात रमण्यासारखा निर्मळ आनंद पैशाने मोजता येत नाही, असे प्रतिपादन बालसाहित्यिक प्रशांत गौतम यांनी सोमवारी येथे केले.अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला जालनातर्फे येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात आयोजित बालकुमार महोत्सवाची सोमवारी सांगता झाली. त्या वेळी ते बोलत होते.यावेळी महोत्सवाच्या अध्यक्षा डॉ. छाया महाजन, रौप्य महोत्सव समितीचे सल्लागार विजय देशमुख, गणेश जळगावकर, डॉ. नारायण बोराडे, कल्पना हेलसकर, डॉ. सुजाता देवरे, जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदाव्रते, कार्यवाह आर. आर. जोशी, जगत घुगे, डॉ. यशवंत सोनुने, बाबासाहेब हेलसकर, संतोष मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती.गौतम म्हणाले की, आज तंत्रज्ञानाच्या युगात माणसामाणसातील संवाद हरवत चालला आहे. एकीकडे व्हॉटसअप, फेसबुक, इंटरनेटसारखी माध्यमे असली तरी संवाद हरवत चालल्याने माणूस हरवतो की काय, अशी स्थिती आहे.कुटूंब, समाज आणि समूहातील विसंवाद कमी होऊन सुसंवाद व्हावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.बालकुमार समारोप समारंभात राज्य शासनाचा बालसाहित्यिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. विशाल तायडे यांचा सत्कार करण्यात आला. चित्रकार मुकुंद दुसे, चित्रकार सुनील पवार, संतोष जोशी, रामदास कुलकर्णी, जगदीश कुडे या मान्यवरांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.संतोष लिंगायत यांनी सूत्रसंचालन केले, तर आर.आर. जोशी यांनी आभार मानले. बालकुमार महोत्सव आयोजनासाठी संतोष मुसळे, संदीप इंगोले, पांडुरंग वाजे, शुभांगी लामधाडे, सुवर्णा मगर, अख्तरजहॉ कुरेशी आदींनी प्रयत्न केले.महोत्सवात घेण्यात आलेल्या अभिनय संवाद स्पर्धेत वैष्णव वाढेकर याने प्रथम, वरद जोशी याने द्वितीय, तनिष्का खेरुडकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. निबंध स्पर्धेत संस्कार प्रबोधिनी विद्यालयाची विद्याथीर्नी वैष्णवी इंगळे हिने प्रथम क्रमांक मिळविला.तनिष्का खेरुडकर हिने द्वितीय तर बद्रीनारायण बारवाले विद्यालयाचा विद्यार्थी वैभव चंद याने तृतीय क्रमांक मिळविला. रंगभरण स्पर्धेत दीपाली मगर, प्रितेश लिंगायत, रुचिरा जोशी, श्रावणी हेलसकर, ऐश्वर्या पाडोळे, साक्षी गायकवाड, पार्थ मगर, वैष्णवी खंदारे, तनिष्का खेरुडकर, वैष्णवी इंगळे, प्रियंका पघळ, माया पाडळे यांनी पारितोषिके पटकावली.युवक कीर्तनकार भक्ती दीपक रणनवरे हिने केलेल्या सानेगुरुजींच्या जीवनावरील कीर्तनाने महोत्सवात अधिक रंगत आली. स्पधेर्चे परीक्षण डॉ. यशवंत सोनुने, संजय निकम, प्रा. दत्ता देशमुख, मुकुंद दुसे, संतोष जोशी यांनी केले.