शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

जालना : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, अशी लढत होणार आहे. पक्षपातळीवर ही लढत खरी असली ...

जालना : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, अशी लढत होणार आहे. पक्षपातळीवर ही लढत खरी असली तरी प्रत्यक्षात मात्र पॅनलच्या माध्यमातून गावातील दोन गट एकमेकांसमोर येतात. त्यामुळे कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते कुठल्या पॅनलमध्ये आहेत, हे सांगणे कठीण होते.

गावपातळीवर अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता कोरोनाच्या काळात जाहीर झाल्या आहेत. वास्तवात या निवडणुका मुदत संपल्याने जूनमध्ये होणे अपेक्षित होते; परंतु त्या काळात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणावर असल्याने निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात ४७५ ग्रामपंचायतींसाठी होऊ घातलेल्या मतदानासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात आपल्याच पक्षाच्या ताब्यात ग्रामपंचायत राहून त्यावर झेंडा फडकविण्यासाठी जय्यत तयारी चालविली जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्यापही पॅनलमधील नावे निश्चित झालेली नाहीत. त्यामुळे उमेदवारी भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत पॅनलमधील उमेदवारांची यादी निश्चित होणार नसल्याचे चित्र आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोधासाठी प्रयत्न सुरू आहेत; परंतु गावपातळीवर फार कमी ठिकाणी बिनविरोध निवडणुका होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे यांच्याप्रमाणेच काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, अ.भा. काँग्रेस समितीचे भीमराव डोंगरे, कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांचा कस लागणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष निसार देशमुख यांचा कस लागणार आहे. परतूर तालुक्यात आमदार बबनराव लोणीकर विरुद्ध माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया अशीच, लढत होईल. जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, मंठा येथे सरळ लढती होणार आहेत. प्रामुख्याने भोकरदन तालुक्यात माजी आमदार चंद्रकांत दानवे विरुद्ध आमदार संतोष दानवे यांचा कस लागणार आहे. या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच कोणता पक्ष वरचढ ठरला हे कळेल.

या तालुक्यात लक्षवेधी

जालना- अर्जुन खोतकर विरुद्ध भास्कर दानवे

परतूर- बबनराव लोणीकर विरुद्ध सुरेश जेथलिया

घनसवंगी- राजेश टोपे विरुद्ध शिवाजी बोबडे

भोकरदन- संतोष दानवे विरुद्ध चंद्रकांत दानवे

सर्वच तालुक्यांत रंगत

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत निवडणुका रंगतदार होणार आहेत. जाफराबाद वगळता अन्यत्र ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.