शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

पर्यारण रक्षणात बांबू पिकांचे मोठे योगदान : पाशा पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:28 IST

जालना बाजार समितीच्या आवारात गुरुवारी समितीचे सभापती तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आयोजित केलेल्या या शेतकरी मेळाव्याला ...

जालना बाजार समितीच्या आवारात गुरुवारी समितीचे सभापती तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आयोजित केलेल्या या शेतकरी मेळाव्याला तालुक्यातील शेतकरी सुरक्षित अंतर राखून उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अप्पासाहेब कदम, युवा सेनेचे राज्य विस्तारक अनिरुद्ध खोतकर संयोजक मकरंद जहागीरदार, प्रा. संजय जाधव, भरत मानकर, विष्णू कदम, मिलिंद सावंत, यांच्यासह बाजार समितीचे संचालक यावेळी उपस्थित होते.

यावेळी पटेल यांनी बांबू वृक्षापासून निर्माण केलेल्या विविध वस्तू उपस्थितांना दाखविल्या, ज्यात बांबूपासून तयार केलेला टॉवेल, टूथब्रश, कागद, तांदूळ, लाेणची तसेच मसाला पदार्थ दखविताना ते म्हणाले की, कोणत्याही वातावरणात कोणत्याही प्रकारचे संसाधने लागत नसताना केवळ बांबूचे पीक झपाट्याने शेतकऱ्यांच्या हाती येते. वर्षाला सरासरी एकरी एक ते दोन लाख रुपये उत्पन्न या पिकापासून मिळते, असा दावा त्यांनी केला.

आपण गेली अनेक वर्षे बांबू पिकांवर काम करत असून, त्यासाठी आवश्यक असलेले संशोधन केंद्र तसेच एक महाविद्यालयही आपण सुरू केले असून, पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील गोदावरी आणि मांजरा या दोन प्रमुख नद्यांसह ११ उपनद्यांच्या दोन्ही बाजूने लाखो बांबूची लागवड करून संगोपन करणार आहे.

बांबूचे प्रयोग सर्वांसाठी महत्त्वाचे

खोतकर म्हणाले की बांबू लागवडीचे प्रयोग आपण यापूर्वीच केले असून, पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यानेच कोरोनासारख्या विषाणूजन्य आजारांना आपल्याला सामारे जावे लागत आहे. पटेल यांनी सुरू केलेला उपक्रम जीवसृष्टीसाठी अत्यावश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात बांबूची लागवड करण्यासाठी आपण सर्व ते सहकार्य करू, असेही ते म्हणाले. योवळी संचालक विष्णू चंद, वसंत जगताप, श्रीकांत घुले, पंडित भुतेकर, प्रा. संजय जाधव, अर्पण गोयल, आदींची उपस्थिती होती. भाऊसाहेब घुगे यांनी सूत्रसंचालन केले.